BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

डोंबिवली सेवाकेंद्र के 'स्वर्ण जयंती उत्सव' निमित्त, VIP प्रोग्राम (दुआओं का सफर, दिल से दिल तक) संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली :   ओम शांति 🙏ब्रह्माकुमारीज डोंबिवली शाखा, (घाटकोपर सब-झोन) की ओर से डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष पुरे होने के "स्वर्ण जयंती उत्सव" के उपलक्ष्य में, आदरणीय शकु दीदीजी (निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र) के मार्गदर्शन एवं प्रेरणा से, "दुआओं का सफर, दिल से दिल तक” (A Blessed journey from Heart to Heart) इस विषय पर विशेष VIP कार्यक्रम का आयोजन किया गया। 

यह कार्यक्रम डोम्बिवली पूर्व के पाटीदार भवन सभागृह में रविवार, १२ अक्टूबर २०२५ को १०.३० बजे संपन्न हुआ।
आए हुए मेहमानों का गोल्डन बैच एवं फोल्डर देकर स्वागत किया गया। कार्यक्रम की शुरुवात परमात्मा की याद से हुई। तत्पश्चात, पवित्र भट ग्रुप डांस अकादमी द्वारा सुन्दर नृत्य प्रस्तृत किया गया ।

आदरणीय ब्रह्माकुमारी राजयोगिनी शकू दीदी जी ने प्रेरणादाई विचार व्यक्त करते हुए कैसे इस डोम्बिवली सेवाकेंद्र की स्थापना १९७५ में २५ दिसंबर को आदरणीय परम श्रद्धेय डॉक्टर नलिनी दीदी के द्वारा हुई, और उसी समय एक आध्यात्मिक प्रदर्शनी का आयोजन किया गया था । उस प्रदर्शनी में आया हुए नगराध्यक्ष भ्राता पटवारीजी ने कहा था मुझे इस डोम्बिवली नगरी को देव नगरी बनाना है, उसी तरह परमात्मा सिर्फ डोम्बिवली नहीं परतु पुरे विश्व को देव नगरी बनाने आये है । साथ ही उन्होंने कहा की हमे अपने अंदर के रावण को पूरी तरह से ख़त्म करना होगा उसीसे हमारे जीवन में परिवर्तन आएगा और सुख शांति की प्राप्ति होगी ।
साथ ही सभी को माउंट आबू, घाटकोपर योग भवन तथा डोम्बिवली सेवाकेंद्र पर आने का हार्दिक निमंत्रण दिया।

तत्पश्चात, आदरणीय निकुंज भाई जी (स्तंभकार एवं मीडिया विंग के राष्ट्रीय समन्वयक) ने अपने बोल रखे, उन्होंने अपने वक्तव्य में VIP का एक अलग ही अर्थ बताया उन्होंने कहा  VIP मतलब वेरी इनोसेंट पर्सन ।
तत्पश्चात, आदरणीय रविंद्र जी ने (अध्यक्ष-भाजपा, प्रदेशाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश) डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष होने के निमित्त शुभ कामनाये दी, और कैसे वे इस ब्रह्माकुमारीज़ संस्था से पिछले कई वर्ष से जुड़े हुए है वो अनुभव साँझा किया ।
कार्यक्रम में आगे आदरणीय शकू दीदीजी, आदरणीय निकुंज भाई जी का और मुख्य अतिथियोंको मोमेंटो देकर सन्मान किया गया ल

निम्नलिखित अतिथि उपस्थित रहे:

1. Bro. Ravindra Chavanji (President of BJP and Pradeshadhyaksh, Maharashtra)
2. Bro. Rajesh More (MLA from Kalyan Rural Assembly constituency in Thane district)
3. Sis. Alka Mutalik Ji (President of Shree Ganesh Mandir Sansthan, Dombivli east) 
4. Bro. Dr. Rajkumar Kolhe Ji (Founder President of Jahnvis Multi Foundation's Vande Mataram Degree College, Dombivli west)
5. Bro Ashok Chandravarkar Ji & Mangala Chandravarkar Ji (Director FDC Ltd)
6. Karnataka Sangha'S Manjunatha College Of Commerce (On Behalf Of Chairaman Bro. Dr.Divakar Shetty, Trustee Devidas Kulal Sir, Urmani Sir,Taranath Sir, Principal Sushila Madam, Mrs Veena Subhash Palan)
7. Bro. Amit Mhatre (Secretary Youth Congress,Dombivli)
8. Sis. Dr. Tara Naik (Md and Gynaecologist, owner of Ashwini Maternity, Nursing Home)
9. Bro. Mr. Bhola Patil (Secretery Obc Dept)
10. Bro Niranjan Kadam (Trustee- Mumbreshwar Temple)
11. Bro. Yogesh Patil (Priest- Mumbra devi Temple) 
12. Bro. Mohan Bhagat (Trustee-Mumbreshwer Temple)
13. Bro.Mr. Shantilal Jain (Prop. M/S Darshan Marbal)
14. Bro. Manoj Kantak Ji (President, Toshvin Analytical Pvt Ltd)
15. Bro. Mahendra Patil (Vice President – Kalyan Jilha OBC Morcha – BJP Mr. Nitin patil (corporator)
16. Bro. Ravi Patil, and Mrs. Jyoti Marathe (corporator)
17. Bro. Dr Milind shirodkar (Director and Chief general surgeon at Aims hospital, Dombivli east)

कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए RJ दिलीप भाई ने आदरणीय शकू दीदीजी तथा आदरणीय निकुंज भाई जी से कुछ सामान्य सवाल जवाब किये । आदरणीय विष्णु बहन जी ने सभी को मेडिटेशन कराया, सभी ने शांति और शक्ति की अनुभूति की ।
कार्यक्रम के अंत में सभीने आ. नलिनी दीदीजी को पुष्पांजलि अर्पित करते हुए सौगात और टोली स्वीकार की और ब्रह्मभोजन के लिए प्रस्थान हुए ।
इस तरह VIP कार्यक्रम उमंग उत्साह के साथ संपन्न हुआ ।
 
Photo and link:
<https://photos.app.goo.gl/nGHZH8AWQLTAREfv6>

<https://drive.google.com/drive/folders/1NYWecg-2TQCBjfX981CVDSS1TzYArAWo?usp=sharing>  

ओम शांति
राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकु दीदीजी
निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र

६० दिवसांचे पैसे भरुन करा ९० दिवस प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकतील. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार आहे.

काय आहे योजना ?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

कोणत्या बससाठी पास उपलब्धः ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)

मासिक पास (३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ३० दिवस वैध

त्रैमासिक पास (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ९० दिवस वैध

एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.

१७ ड्रग्स माफियांवर ११५ किलो गांजा जप्त करत कल्याण खडकपाडा पोलीसांची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : अंमली पदार्थांच्या तस्करी जाळ्याचा धसका भरवणारी भव्य कारवाई करत खडकपाडा पोलीसांनी तब्बल १७ ड्रग तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मोक्का अंतर्गत ड्रग माफियांविरोधात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. कल्याण झोन-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलीसांनी तब्बल ११५ किलो गांजा, पिस्तूल, वॉकी-टॉकी संच, वाहने आणि तब्बल ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विशाखापट्टणम ते कल्याण असा अंमली पदार्थाचा पुरवठ्याचे जाले उभारले होते.

कल्याण जवळ बाल्ल्यानी परिसरात राहणारा गुफरान हजरान शेख हा या तस्कर टोळीचा म्होरक्या असून, त्यांच्यासह १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ४ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलीसांना 'ऑपरेशन ड्रग बर्स्ट' ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे व पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने केली. या तपासात पोलीसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आरोपींच्या ताब्यातून ६२ किलो गांजा, १ पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संच चार्जरसह जप्त केले.
अटक केलेल्या आरोपींची नावे गुफरान शेख, बाबार शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, असिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश ननावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिंगारदे, गणेश जोशी अशी असून आणि इतर ५ आरोपींचा समावेश आहे.

'ड्रग माफियांचा सळसळाट रोखण्यासाठी मोक्का हाच प्रभावी उपाय' - डीसीपी अतुल झेंडे


या प्रकरणात आरोपींनी आर्थिक लाभासाठी संघटित गुन्हेगारी केल्याचे स्पष्ट झाल्याने, महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. उपयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, 'राज्यातील ड्रग तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी खडकपाडा पोलीसांची ही कारवाई आदर्श ठरेल'. या संपूर्ण तपासाचा पुढील भाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना आणि बीड  येथील आसपासच्या गावातील बऱ्याचशा भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाल्याकारणाने शिवसेनेच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार, संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात मराठवाडा येथील जालना, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात एकूण ४५०० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची मदत पोहचविली जात आहे. आज बीड जिल्हा तालुका बीड येथील कुर्ला गाव येथे सकाळी १० वाजता सिंदपाना नदी किनाऱ्यावरील एकूण १४ गावांच्या आपतग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गरजेच्या वस्तू असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.
शिवसेना कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक राजन मराठे, डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेधे, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे, संजय निकते हे पदाधिकारी उपस्थित होते. बीड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुलुक, स्वप्नील गलधर आणि श्याम सुंदर पडुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती  ह्यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून हा वाटप कार्यक्रम पार पडला.

पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा स्वबळाचा नारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पॅनल निहाय संघटनात्मक बैठका तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भारतीय जनता पार्टी स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या बरोबर माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शहर अध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पॅनल निहाय सभांचा धडाका सुरू आहे.

या बैठकीत भाजपचे सर्व जेष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी देखील एक सुराने स्वबळावर निवडणूक लढण्यास उत्सुकता दर्शविली. कल्याण-डोंबिवली मध्ये भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा मोठा वर्ग राहत असून पूर्वी पासून भाजप चा गड मानला जातो म्हणून या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे मत जिल्हा अध्यक्ष नंदु परब यांनी व्यक्त केले.

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून बलात्कार केला आणि व्हिडीओ काढल्याने एकच खळबळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : दिल्लीत एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर भागातील एका हॉटेलमध्ये १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने २० वर्षीय तरुणावर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली, असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी तिच्या कॉलेजमध्ये शिकत असून मित्र आहे. त्याने मैत्रीच्या बहाण्याने तिला 'हॉटेल ऍपल' मध्ये नेले. पोहोचताच त्याने तिला अंमली पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने त्याच्यावर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचा आरोपही केला आहे. गुन्हा करत असताना त्याने फोटो, व्हिडीओ काढले असा तिचा दावा आहे. 

पीडित तरुणी हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहे. ती दिल्लीच्या रोहिणी येथील 'बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज'च्या वसतिगृहात राहत आहे. पोलीसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशात आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका शाळेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, दक्षिण दिल्लीच्या सीआर पार्क परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षकाने तीन वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या शिक्षकानेही मुलीला धमकावले आणि ब्लॅकमेल केले, असे पोलीसांनी सांगितले.

बलात्काराची तक्रार कशी दाखल करावी ?
पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑनलाइन (१०० किंवा महिला हेल्पलाइन १८१) तक्रार नोंदवा. CrPC कलम १६४A अंतर्गत रुग्णालयात तक्रार नोंदवता येते. पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये कायद्याने मदत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, ज्यात महिला पोलीस किंवा वकीलाची उपस्थिती असते. तक्रार नोंदवण्यासाठी वय किंवा इतर कोणतीही अट नाही.

बलात्कार प्रकरणात कायद्याची तरतूद काय आहे ?
भारतीय न्याय संहिता (२०२३) अंतर्गत बलात्कारासाठी किमान १० वर्षांची तुरुंगवास आणि कमाल मृत्युदंडाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कारासाठी कठोर शिक्षा, ज्यात २० वर्षांपर्यंत किंवा मृत्युदंड. नवीन कायद्यात पीडितांच्या संरक्षणासाठी झीरो टॉलरन्स धोरण आहे, ज्यात तपासासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वैवाहिक बलात्कार अद्याप गुन्हा मानला जात नाही, परंतु यावर चर्चा सुरू आहे.

बलात्कार पीडितांसाठी मदत आणि संरक्षण काय उपलब्ध आहे ?
पीडितांना वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत मिळते. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) किंवा UNFPA सारख्या संस्था समुपदेशन देतात. POCSO कायद्याखाली अल्पवयीनांसाठी विशेष संरक्षण. पोलिस तपासादरम्यान पीडितेची ओळख गोपनीय ठेवली जाते आणि तिला सुरक्षित निवासाची व्यवस्था केली जाते. 

हेल्पलाइन क्रमांक:
 १०९८ (बालिका) किंवा १८१ (महिला).

सरकारच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ सिरप देण्यास बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : मध्य प्रदेशात कफ सिरप दिल्यानंतर लहानमुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याने अनेक राज्य सरकारनी या औषधांवर बंदी घातली असताना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकारने दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेतला आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयाने उच्चस्तरिय व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन जिल्हा स्तरिय अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. औषधांचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्याने करावा आणि याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आदेश आरोग्य कर्मचारी आणि संबंधितांना दिले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये सामान्यत: सर्दी आणि पडसे आपोआपच बरा होत असतो. यासाठी औषधे देणे अनावश्यक असते.

सर्वसामान्य जनतेनेही मनाने डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरु केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांचे रिस्क बेस्ड इन्स्पेक्शन (Risk-Based Inspection) करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथके नेमली आहेत.