BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

डोंबिवलीत अवैध ऑनलाईन लॉटरीचा धंदा पोलीसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जोमात सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाले असूनही राम नगर पोलीसांना याची काहीच माहिती नाही असे होऊ शकत नाही. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र चालू आहे. अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांची कुटुंबे हलाकी आणि हालपेष्टाचे दिवस काढत आहेत. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर आहुजा, भानुशाली नावाच्या व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.


राम नगर पोलीसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. रामनगर डोंबिवली पोलीसांच्या हद्दीत हा प्रकार घडत असूनही, पोलीसांना याची साधी कल्पना हि नाही हे होऊच शकत नाही असा डोंबिवलीकर नागरिकांचा समाज आहे. या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत राम नगर पोलीसांना विचारणा केली असता ते माहिती घेऊन कळवतो असे उत्तर थातूरमातूर देत आहेत. तसेच ठाणे, कल्याण पोलीस कंट्रोल कडून माहिती घेतली असता त्यांनाही या लॉटरीबाबत काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र सुरु आहेत. एकीकडे शासन ऑनलाईन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोकं कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्थानिक वरिष्ठ पोलीसांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालकांवरती ताबडतोब कठोर कारवाई करावी तसेच यामागे वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकर नागरिकांकडून जोर धरत आहे.

दिव्यात ‘जय जय रवळनाथ’ नाट्यप्रयोगाला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळाच्या वतीने आयोजित ‘जय जय रवळनाथ’ या चालचित्रयुक्त नाट्यप्रयोगाचा भव्य कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी दिव्यातील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हा चलचित्रीत दशावतार नाट्यप्रयोग दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ या मंडळाने तर मंडळाचे संचालन सिध्देश सुधीर कलिंगण यांनी केले. या वर्षीच्या दिग्गज नावलौकीक उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार संचासहित, महान पौराणिक भव्यदिव्य, संघर्षमय, चलचित्रीत नाट्य कलाकृती काल चाकरमान्यांसमोर सादर झाली. तसेच कार्यक्रमाचे समालोचन विवेक पोरजी आणि करुना ढेगे यांनी सादर केले. कार्यक्रमाआधी थोडासा पाऊस पडला असला तरी चाकरमान्यांच्या उत्साहात किंचितही फरक पडला नाही. एक वर्षांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील दिव्यातील नागरिकांनी उपस्थित राहून ‘जय जय रवळनाथ’ दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला.
महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन, चित्रविचित्र किड्यावर मांत्रिक ध्यानस्त, चलचित्रीत मंदिराचा देखावा, बुरुजातून दिव्य शक्ती प्रगट, रुद्र तेजोमय त्रिशूळ रवळनाथाच्या हाती येणे, घोड्यावर बसून रवळनाथाचे आगमन, अचाट शक्तीची निमिर्ती, ज्योतीबा दर्शन आणि महाकाय रेडा संग्राम, त्रिशूळ तेजोमय होणे, त्रिसूळातून अधांतरी चितविचित्र पिशाच्छ निमिर्ती, त्रिशूळाच्या सहाय्याने रेड्याचे शीर मारणे, त्रिशूळाने मांत्रिकाचा संहार होणे हे सर्व नाट्य प्रयोग हलत्या चलचित्रातून चाकरमान्यांनी पाहिले. दिव्याच्या संस्कृतीत भर घालणारा हा नाट्यप्रयोग सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदु परब, माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे, ठाणे जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, विजय भोईर, अशोक पाटिल, गणेश भगत, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रोशन भगत, रेश्मा पवार, सीमा भगत, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, चेतन  पाटिल, समीर चव्हाण, सतीश केळशीकर, साहिल पाटिल, अशोक गुप्ता, गौरीशंकर पटवा, अवधराज राजभर, जिलाजीत तिवारी, पूनम सिंग, रीना सिंग, नीलम मिश्रा आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या दशावतारी नाट्य प्रयोगासाठी विशेष मेहनत नितिश कोरगांवकर, रवी मुननकर, विठ्ठल गावडे, किरण कोरगांवकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ आणि अनिल गावकर यांनी घेतली होती.
कलाकार सिध्देश कलिंगण, काका कलिंगण, निळकंठ सावंत, रोहित नाईक, राधाकृष्ण नाईक, सुनील खोरजूवेकर, पप्पू घाडीगावकर, संजय लाड, परशुराम मोरजकर, तर लोकराजा ट्रीकसीन ग्रुप नेरुर कौस्तुभ कलिंगण, प्रतिक कलिंगण, संजय नेवगी, तुषार परब, रोहित नारकर, श्रीकृष्ण सावंत, प्रथमेश परब, सिध्देश तारवे, कुणाल पेंडुरकर, मयूर माने, मनीष नेरुरकर, तर संगित साथ हार्मोनिअम आशिष तवटे, मृदुंगमणी चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण यांनी संगतील दिले आहे.

निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. १ : सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष ऍड. अभय छाजेड, आमदार भाई जगताप, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डॉ. अजित नवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले.

विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकार नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूणच घेत नाही.

सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का ? अशी शंका येते.. ज्येठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

डोंबिवलीकरांचा 'रन फॉर युनिटी' एकता दौड ला एकतेचा संदेश देत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३१ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी डोंबिवली येथे ठाणे पोलीस कमिशनरेट यांच्या माध्यमातून "रन फॉर युनिटी" या एकता दौड चे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमांस डोंबिवलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे पोलीस कमिशनरेट आयोजित 'एकता दौड' आप्पा दातार चौक येथून सुरू होऊन गणेश मंदिर संस्थान - नेहरू रोड - भाजी मार्केट - फडके रोड  - मदन ठाकरे चौक या मार्गे परत आप्पा दातार चौक येथे समाप्त झाली. कार्यक्रमादरम्यान डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे नागरिकांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी या प्रदर्शनास विशेष उत्साहाने भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात रामनगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग) सुहास हेमाडे, डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड, सोनी मराठी वरील क्राईम पॅट्रोल मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता तथा निवेदक सतीश नायकोडी, डोंबिवलीतील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, तसेच शाळा-कॉलेजमधील एनएसएस व एनसीसी विद्यार्थी आणि स्पोर्ट्स ऍकॅडमी चे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सुमारे २५० ते ३०० नागरिक "रन फॉर युनिटी" या एकता दौड कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी डोंबिवली पोलीसांकडून योग्य ती दक्षता घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीसांकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.

महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) संघाच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे कार्बाइड गन (Carbide Gun) वर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका आणि महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी कार्बाइड गन आणि स्फोटक फटाके यांचा वापर तात्काळ थांबवावा, असे आवाहन केले आहे. या कार्बाइड गनमुळे देशभरात अचानक नेत्र अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटी) च्या अहवालानुसार भोपालमध्ये १५० हून अधिक मुले जखमी झाली आणि काहींनी दृष्टी गमावली. मध्य प्रदेश, चंदीगड आणि पुणे येथे सुद्धा अशाच घटना नोंदल्या गेल्या ज्यात बहुतेक लहान मुले बळी ठरली. कॅल्शियम कार्बाइड आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार होणारी ही कार्बाइड गन धोकादायक गॅस उत्पन्न करते ज्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी गमावणे आणि चेहऱ्याचे विकृतीकरण होऊ शकते.



डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या,“ही खेळणी नाहीत, ही तर रासायनिक स्फोटके आहेत जी काही क्षणांत डोळ्यांचे नुकसान करू शकतात. सण आनंदाचा असावा, दुःखाचा नव्हे. सरकारने यावर पूर्ण बंदी आणावी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.” MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी) ने AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)च्या लोकजागृती मोहीम, कायदेशीर कारवाई आणि रुग्णालयांच्या तयारीबाबतच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. नुकतीच दिवाळी आणि छटपूजा सण संपून ख्रिसमस आणि नववर्ष हे सण जवळ आल्याने MOS कडून सर्वांना विशेषतः पालकांना, शाळा प्रशासन यांना अशा धोकादायक वस्तूंचा वापर टाळावा आणि मुलांना त्यापासून दूर ठेवावे “दिवाळी संपली असली तरी सणांचा मौसम अजून सुरू आहे. आता एका डोळ्याचे सुद्धा नुकसान होऊ देऊ नका. प्रकाशाचा सण अंधाराचा कारण होऊ नये.”
 असे आवाहन MOS संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या कडून करण्यात आले आहे.
AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
आणि MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
यांचे एकत्रित आवाहन केले आहे  कि कार्बाइड गनवर बंदी घाला, प्रत्येक डोळा आणि प्रत्येक मुलाचे संरक्षण करा.

पहिल्या ह्युमनॉईड रोबोट चे प्री-बुकिंग सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
कॅलिफोर्निया : 1X कंपनीने 'ह्युमनॉईड रोबोट निओ' या पहिल्या ह्युमनॉईड रोबोटचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर या रोबोटची प्री-बुकिंग सुरू झाली आहे, बुकिंगसाठी २०० डॉलर (सुमारे १७,६५६ रुपये) द्यावे लागतील, ज्यांना हा रोबोट प्रवेश हवा आहे त्यांना हा रोबोट २०,००० डॉलर (सुमारे १७ लाख  ६५ हजार ६४० रुपये) मध्ये मिळेल.

कॅलिफोर्नियास्थित एआय आणि रोबोटिक्स कंपनी 1X ने एक रोबोट तयार केला आहे जो माणसासारखा दिसतो, कंपनीने पहिल्या 'ह्युमनॉईड रोबोट निओ' चे प्री-बुकिंग सुरू केले आहे, हा ह्युमनॉईड रोबोट तुम्हाला साफसफाई, स्वयंपाक, भांडी धुणे आणि कपडे धुणे, दरवाजा उघडणे, सामान आणणे, लाईट चालू / बंद करणे यासारख्या सर्व दैनंदिन कामांमध्ये मदत करेल.

हा रोबोट अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की तो लोकांचे शब्द समजू शकेल. २९.९४ किलो वजनाचा हा रोबोट ६९.८५  किलोपर्यंत वजन सहज उचलू शकतो. हा रोबोट आजच्या आधुनिक रेफ्रिजरेटरपेक्षा कमी आवाज (नॉईज लेव्हल २२ डिबी) करतो. रोबोटशी संवाद साधण्यासाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय आणि 5G सपोर्टशिवाय श्रोणि आणि छाती जवळ ३ स्टेज स्पीकर आहेत.

देशात लवकरच सुरु होणार थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : एलॉन मस्क यांची कंपनी, स्टारलिंक, भारतात त्यांच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू करत आहे. कंपनी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत एक डेमो रन आयोजित करेल. सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेसाठी नियामक मंजुरी मिळविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की या डेमोमध्ये तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर केला जाईल. पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कायदा अंमलबजावणी संस्था या ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवतील.

भारताचा सॅटेलाईट ब्रॉडबँड बाजार अजूनही नवोदित अवस्थेत आहे. जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या देखील बाजारात प्रवेश करत आहेत, परंतु स्टारलिंकची तंत्रज्ञान जागतिक स्तरावर ओळखली जाते. भारतीय बाजारपेठेत स्टारलिंकच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढेल, किंमती कमी होतील आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.

स्टारलिंक हा एक स्पेसएक्स प्रकल्प आहे जो उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करतो. त्याचे उपग्रह पृथ्वीच्या जवळून फिरतात, ज्यामुळे जलद आणि सुरळीत इंटरनेट प्रवेश सुनिश्चित होतो. हे विशेषतः ग्रामीण भाग किंवा पर्वतरांगासारख्या भागात फायदेशीर आहे जिथे नियमित इंटरनेट प्रवेश उपलब्ध नाही.