BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

सिबीएसई बोर्डाचा दहावीच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. या संदर्भातील निर्णय आज (२५ जून) सीबीएसई घेतला आहे. त्यामुळे २०२६ पासून दहावीचे विद्यार्थी वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहेत.

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारा हा बदल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या निर्णयानुसार २०२६ पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षेला बसता येणार आहे. या निर्णयामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी, हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

मिशन Axiom-4 साठी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात रवाना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

फ्लोरीडा - भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी झेप घेतली. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०१ वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. २८ तास ५० मिनिटांच्या प्रवासानंतर ते ISS वर पोहोचले. ही मोहीम भारतासाठी ऐतिहासिक ठरली कारण राकेश शर्मा यांच्या १९८४ च्या प्रवासानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आणि ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या सोबत अमेरिकेच्या पेगी व्हिटसन (मिशन कमांडर), पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे देखील सहभागी होते.

या १४ दिवसांच्या मोहिमेत शुक्ला विविध वैज्ञानिक प्रयोग करत आहेत. यात सूक्ष्म गुरुत्वात शैवाळींची वाढ, मानवी मूत्रातील नायट्रोजनचा पुनर्वापर, बीज अंकुरण, स्नायूंच्या पेशींचा अभ्यास, आणि अंतराळातील संगणक प्रणालींचा वापर यांचा समावेश आहे. हे प्रयोग भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. मोहिमेच्या सुरुवातीला शुक्ला यांनी देशवासीयांना उद्देशून एक भावनिक संदेश दिला, “७.५ किमी/सेकंद वेगाने पृथ्वीभोवती फिरताना, खांद्यावरचा तिरंगा मला १४० कोटी भारतीयांची आठवण करून देतो. ही यात्रा माझी नाही, आपल्या सर्वांची आहे. जय हिंद!”

शुक्ला यांनी अंतराळात काही खास गोष्टीही सोबत नेल्या - गाजर हलवा, आमरस, मूग डाळ हलवा आणि ‘जॉय’ नावाचा एक छोटा पांढरा हंस खेळणं, जे सूक्ष्म गुरुत्व दर्शवण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या या यशामुळे लखनऊमधील त्यांचे कुटुंब अत्यंत आनंदित आहे. त्यांच्या आईने अभिमानाने सांगितले की, “माझा मुलगा देशाचं गौरव आहे.” Axiom-4 ही मोहीम केवळ एक वैज्ञानिक प्रयत्न नाही, तर भारताच्या आत्मनिर्भर अंतराळ स्वप्नांची सुरुवात आहे. ही मोहीम ISRO, NASA आणि Axiom Space यांच्यातील सहकार्याचे प्रतीक असून, भारताच्या गगनयान कार्यक्रमासाठीही एक दिशादर्शक ठरणार आहे.

सावत्र भावानेच काढला भावाचाच काटा; कल्याण मधील नालिंबी खून प्रकरणाचा झाला उलगडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण तालुक्यातील नालिंबी गावच्या जंगलात आढळलेल्या शिरविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, सावत्र भावानेच संपत्तीच्या वादातून भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

२९ मे २०२५ रोजी सकाळी नालिंबी ते अंबरनाथ रस्त्यालगत असलेल्या निर्जन जंगलात एका अनोळखी पुरुषाचा शीर विरहित मृतदेह आढळला होता. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस पाटील संगीता शिंदे यांच्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या अमानुष खुनाच्या तपासासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. घटना स्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचे तांत्रिक प्रयत्न, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटना स्थळाजवळ संशयास्पदरीत्या आढळलेली कार. तपासणीअंती ही कार सलमान महंमद गौरी अन्सारी (वय: २५ वर्षे, रा. मांडा, टिटवाळा) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सलमानला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने थरकाप उडवणारी कबुली दिली. मृत इसम त्याचाच सावत्र भाऊ फैसल अन्सारी (वय: २९ वर्षे) असून, संपत्तीच्या वादातूनच त्याचा खून केला, आणि पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केले. या खुनाच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' चा 'रौप्य महोत्सवी वर्ष २०२५-२०२६' सोहळा उल्हासात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली कोपर येथील 'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' ची शैक्षणिक भरारी आकाश झेप घेत आहे. गेली २५ वर्षे सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सोहळा दिनांक २३ जून रोजी साजरा करण्यात आला. 'जे एम एफ' संस्थेचा रजत महोत्सव, जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचा अठरावा स्थापना दिवस तसेच जन गण मन विद्यामंदिर शाळेचा दहावा स्थापना दिवस व वंदे मातरम महाविद्यालयाचा सत्रावा उत्सव मोठ्या उत्साहात मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. रांगोळ्या, फुलांनी दिव्यांनी शाळा सजवली होती.
 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन  व स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे अष्टप्रधान मंडळ व संस्थापित सहकारी यांनी आपल्या भाषणात संस्थेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. गेली पंधरा ते पंचवीस वर्षे संस्थेशी जुळलेली नाळ ही खऱ्या अर्थाने कौटुंबिक सुखाची झालर आहे आणि हेच सर्वांचे भावनिक नाते आहे, असे सर्वांनीच आपल्या भाषणात नमूद केले.
रौप्य महोत्सव दिना निमित्त संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते सर्वांना चांदीच्या गणपतीची प्रतिमा भेट देण्यात आली. सर्वस्व आणि सत्ता याचा मोह सर्वांनाच असतो. परंतु नशीबा बरोबरच प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती सत्ता उभी करणे म्हणजेच मिळालेल्या यशाची फळे चाखण्यासारखे आहे. २५ वर्षाचा प्रवास सोपा नव्हता, अथक परिश्रम, जिद्द, नकारात्मकतेला सकारात्मक रित्या बदलून केलेला प्रवास म्हणजेच आकाशाकडे झेपावणारी ही 'जे एम एफ' संस्था होय, आणि त्या अंतर्गत सक्रिय असलेल्या शाळा आणि महाविद्यालये नागपूर (दावसा) मधील इंग्रजी शाळा म्हणजेच ही यशाची पोच पावती आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये असताना, दोन हजार साली केलेली कल्पना म्हणजे एक छोटसं लावलेलं शिक्षणाचं रोपटेच म्हणावे लागेल, आणि ती कल्पना साकार होत असताना  त्याची वेल हळूहळू पसरत मुंबई सारख्या राजधानीत पसरला व त्याचा महाकाय असा गुरु शिष्याचं नाते निर्माण करणारा वटवृक्ष तयार झाला. सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचा विसर पडता येणार नाही पण त्यामुळेच अभिमानाने आणि गर्वाने आम्ही तुम्ही सांगू शकतो की, होय ही आमचीच 'जे एम एफ' संस्था आहे. असे उद्गार सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले.
संस्थापकानी लिहिलेल्या जन गण मन शाळेचे गाणे हजारो मुलांनी गाऊन संस्थेला, शाळेला मानवंदना दिली, त्याच बरोबर नाटक, नृत्य, प्रदर्शित करून सर्वांनाच आनंद दिला. पंचवीस वर्षाच्या प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली. शाळेच्या प्रांगणात लावण्यासाठी रोपटे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लिरा आणि श्रुतिका यांनी केले तर स्वागतपर भाषण अद्वैत या विद्यार्थ्याने केले. केक कापून संस्थेचा रजत महोत्सव साजरा केला तर सर्व मुलांना आवडीच्या जेम्स गोळ्या चे पाकिट देण्यात आली. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी ‘आठवले’ घराण्याचा कवी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईत रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात सात रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला खरं सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र यांनी कविता सादर केली.

फडणवीसांनी सादर केलेली कविता

तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो
नसे ना का अर्थ, अनर्थ तर नसतो
अरे तुम्ही काय कविता कराल
पण, आणि, किंवा, परंतु,
अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे,
कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरुन गेली पाहिजे.

मुंबईतील नामांकित शाळेत वाटण्यात आली पंजाबी भाषेची पुस्तके..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : केंद्र सरकारकडून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या भूमिकेबाबत राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आज मुंबईतील एका नामांकित शाळेत पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली आहेत. यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पुस्तके परत घेण्याची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार अशी ठाम भूमिका मनसे आहे. मुंबईच्या भांडुप परिसरात असलेल्या गुरुनानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली शाळेला धडक. अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तके परत घेण्यात येणार याचे आश्वासन देण्यात आले. शाळेच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी राज्यातील मराठी शाळांममध्ये हिंदीची सक्ती नको असं रोखठोक मत व्यक्त केले. जर हिंदी सक्ती केल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला. राज ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. भांडुपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्री करणा-या दुकानात जाऊन पहिली ते चौथीपर्यंतचे हिंदीचे पुस्तकं विक्रीसाठी आल्यास त्याची विक्री करू नका असा इशारा दिलाय. त्यानंतरही हिंदींच्या पुस्तकाची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तक जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे डोंबिवलीत वाढीव कराची बिले जाळून आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न राबविण्याकरिता घर करामध्ये ३०० रुपयाची मोठी वाढ केली आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेकडील शिवसेना शाखा येथे आज सोमवारी आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाने वाढवलेली कर बिलं थेट नागरिकांच्या दारात पोहोचवली आहेत. या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून कर बिल जाळण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्यासह जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, महिला विधानसभा संघटिका सुप्रिया चव्हाण, महिला शहर संघटिका अक्षरा पाटेल प्रियंका विचारे, उपशहर प्रमुख संजय पाटील, शाम चौगुले, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, उपविभाग प्रमुख भावेश पवार, शाखाप्रमुख सचिन जोशी, आकाश पाटील, राजेश पाटील, मंगेश सरमाळकर, सुरज पवार इत्यादी पदाधिकारी सोबत महिला आघाडी आणि युवासैनिक तसेच अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जर ही करवाढ मागे घेतली नाही, तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी म्हात्रे यांनी दिला.