BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी विजय भोईर यांची निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक २०२५-३० च्या निवडणुकीत एकता पॅनल विजयी झाले. तब्बल ५८ वर्षानी ही निवडणूक पार पडली. डोंबिवली पूर्वेकडील हभप सावळाराम क्रीडा संकुलामधील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल दमदारपणे निवडून आले होते. गुरुवारी एकता पॅनलने सर्वानुमते विजय भोईर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पश्चिमेकडील डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीच्या कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी पतपेढीतील पदाधिकाऱ्यांनी विजय भोईर यांचे पुष्पगुच्छ देवून व पेढे भरवून अभिनंदन केले. पुढील पाच वर्षाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष - विजय भोईर, उपाध्यक्ष - शरद पांढरे, कोषाध्यक्ष - अनघा पवार, सचिव - गणेश गोल्हे कामकाज पाहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

'जे एम एफ' च्या दहावी माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये जन गण मन इंग्रजी शाळा व विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांचे उज्वल यश संपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: शैक्षणिक ध्येयाला कलाटणी देणारा काळ म्हणजे दहावी. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र व दिल्ली बोर्ड माध्यमिक परीक्षांचा निकालामध्ये जन गण मन इंग्रजी शाळा आणि विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचा झेंडा उंच फडकावला.
जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा मधून निषाद रानडे या विद्यार्थ्याने ९६ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर महिमा पांडे हिने ९४ टक्के व क्षितिज मुळीक याने ९१ टक्के मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. जन गण मन विद्यामंदिर मधील मुग्धा शेटे या विद्यार्थिनीने ९१ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर श्रुती कारिया हिने ८८ टक्के तर सौरभ दुबे याने ८७ टक्के मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
     
शाळेचे नावलौकिक उज्वल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे 'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पाठीवर पडलेली  कौतुकाची थाप ही तुमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, आणि वेळीच चांगली अद्दल घडवण्यासाठी पाठीवर पडलेला हात तुमचे भवितव्य घडविणारा मार्ग आहे. यशाची व्याख्या म्हणजे स्वप्नपूर्ती तर अपयशाने खचून न जाता उभारी घेणे म्हणजे सुवर्ण संधी. असे सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचाली साठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

शिशुविहार ते दहावी पर्यंत तुम्ही ह्या शाळेत शिक्षण घेतले, राग, लोभ, मित्रांबरोबर होणारी भांडणे पण लगेच राग निवळून सलोखा झालेले मित्र, शिक्षकांबरोबर झालेल्या प्रश्न उत्तराच्या स्पर्धा या आणि अशा प्रकारच्या अनेक  आठवणींच्या गोष्टींची शिदोरी घेऊन तुम्ही शाळेतून बाहेर पडताना मात्र मोठे यश मिळवून शाळेचे नाव उज्वल करून भविष्याच्या वाटेवर आपली वाटचाल करणार आहात याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा असे सांगून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्वांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या, उप प्राचार्या आणि शिक्षकांनी स्वतः जातीने यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

कल्याण महापालिका आयुक्तांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन मीटिंग मध्ये आरोग्य यंत्रणेत आमुलाग्र सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून दिले निर्देश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : महापालिका आयुक्त यांचे दालनात आज सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची मॅरेथॉन मीटिंग घेण्यात आली. यात आरोग्य यंत्रणेत आमुलाग्र सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश देण्यात आले. कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी देखील महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संपूर्ण दिवसभर महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेत आमुलाग्र सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकारी वर्गास निर्देश दिले. यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर तसेच महापालिका मुख्यालय आणि मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

शासनाने महापालिकेस ७५ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (हेल्थ वेलनेस सेंटर्स) मंजूर केली आहेत. त्यापैकी २० महापालिका क्षेत्रात कार्यान्वित असून बारा आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. ही सर्व शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र चालू करण्याकरिता आयुक्तांनी खालील निर्देश दिले :

• आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या नियुक्त्या वेळेत पूर्ण कराव्यात.
• आरोग्यवर्धिनी केंद्राचे बांधकाम अपूर्ण असल्यास ते तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे.
• त्यासाठी शहर अभियंता कार्यालयासमवेत समन्वय बैठक आयोजित करण्यात यावी  .
• आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणांपैकी खरेदी न करण्यात आलेल्या उपकरणाची  तात्काळ खरेदी करण्यात यावी. 
• या आरोग्यवर्धिनी केंद्रांकरिता आवश्यक असलेले फर्निचर   देखील तात्काळ खरेदी करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी.
• रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा .
• राज्य शासनाकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यता असल्यास तपासून घ्यावी.
•"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू करण्यासाठी शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेसोबत समन्वय साधून त्यांना सदर दवाखाना चालू करण्यामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी.
• शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी स्त्री रोग तज्ञ व भुलतज्ञ यांची उपलब्धता होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयाशी यांच्याशी संपर्क साधावा.
• महापालिकेच्या सर्व रुग्णालयात त्यांच्या क्षेत्रातील हाय रिस्क गर्भवती माता यांची नावासहित यादी उपलब्ध असणे आवश्यक आहे ,अशी यादी महिन्याच्या प्रारंभी अद्ययावत करण्यात यावी .
• एनक्यूएएस च्या मानका नुसार महापालिका परिक्षेत्रातील १३ नागरी आरोग्य केंद्र व सर्व रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी मुख्यालय स्तरावर पथक स्थापन करण्यात यावे.
• आयुष्यमान भारत च्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णालयांमध्ये तसेच नागरी आरोग्य केंद्रामध्ये आयुष औषधांची उपलब्धता करून द्यावी.
• महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून आवश्यकता सुधारणा करून घ्याव्यात.
• महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवा चालू करण्यात याव्यात.
• बाहय संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले डॉक्टर्स उपलब्ध नसल्यास त्यांच्या सेवा समाप्त करणाऱ्या याव्यात.
• प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रा साठी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांचा  आढावा आयुक्त महोदयांना देण्यात यावा .
• बाई रुख्मिणी बाई रुग्णालयाकरिता डिजिटल एक्स-रे मशीन तसेच डेंटल एक्स-रे मशीन खरेदी करण्यात यावी.
• राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुग्णालयांमध्ये करण्यात याव्यात.
• वैद्यकीय आरोग्य विभागाकरिता मनुष्यबळ पुरवणाऱ्या बाह्य संस्थांनी पुरविलेल्या डॉक्टरांची वेगळी बैठक आयोजित करण्यात यावी. 
• सर्व रुग्णालयांच्या संदर्भ सेवांचे ऑडिट करण्यात येऊन त्यांचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा, अशा अनेक सूचना या आढावा बैठकीत आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
• त्याचप्रमाणे आरोग्य सुविधांबाबत एक दिवसाआड सायंकाळी आयुक्त कार्यालयात आढावा घेतला जाईल असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

भारतीय संरक्षण दलाने पाकिस्तानला धडा शिकवल्याचे केले स्पष्ट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर च्या सशस्वीतेबद्दल सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तसंच पाकिस्तानच्या लष्कराच्या ३५-४० जवानांचा या ऑपरेशनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या लष्कराने दिली. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कशाप्रकारे एअर स्ट्राईक केला, हे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यासकट दाखवलं आहे. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजी एअर ऑपरेशन्स ए.के.भारती, डीजी नेव्ही ऑपरेशन्स वाईस एडमिरल ए.एन.प्रमोद यांनी पाकिस्तानवर कशाप्रकारे हल्ला केला गेला ? याची पूर्ण माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

लष्कराने सांगितले की, आम्ही ६ आणि ७ मे च्या रात्री कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नाही. पण ७ मे रोजी पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांना आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले. मग आम्ही त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि रडारला लक्ष्य केले. बहावलपूरमध्ये ३ क्षेपणास्त्रे डागून आम्ही दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले. ७ मे रोजी ड्रोन डागण्यात आले. आम्ही दहशतवाद्यांना मारले पण पाकिस्तानने आमच्या सामान्य लोकांना लक्ष्य केले. आम्ही लाहोरचे रडार आणि गुजरानवाला येथील एईडब्ल्यू  प्रणाली नष्ट केली.

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, ‘आम्ही अनेक दहशतवाद्यांचे अड्डे ओळखले होते. पण भीतीमुळे अनेक दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे करण्यात आले. लक्ष्ये खूप विचारपूर्वक ठरवली गेली. बहावलपूर आणि मुरीदकेचे लक्ष्य हवाई दलाला देण्यात आले होते. अचूक लक्ष्यीकरण सुनिश्चित करण्यासाठी हवेपासून पृष्ठभागावर अचूक दारूगोळा वापरण्यात आला. ७ मे च्या हल्ल्यानंतर आमची हवाई संरक्षण यंत्रणा सदैव तयार आहे.

१००% निकालाचा विक्रम! जोगेश्वरीतील ‘बालविकास’ आणि ‘आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल’च्या गुणवंतांचा झळाळता नावलौकिक!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

जोगेश्वरी पूर्व : शिक्षण क्षेत्रात एक नवीन सोनेरी अध्याय! रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचलित ‘बालविकास विद्या मंदिर’ आणि ‘आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल’ या दोन्ही शाळांनी यंदाच्या शालांत परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा उच्चांक गाठला आहे!

बालविकास विद्या मंदिर
  • प्रथम क्रमांक: कुमारी अश्मि महेश सावंत – ९७.६०%
  • द्वितीय क्रमांक: कुमारी निधी सावंत – ९६%
  • तृतीय क्रमांक: कुमारी श्रेया संतोष सुतार – ९५%
आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल
  • प्रथम क्रमांक: कुमार प्रसाद प्रकाश नारकर – ९६.६०%
  • द्वितीय क्रमांक: कुमारी श्रावणी कदम – ९३%
  • तृतीय क्रमांक: कुमारी वैष्णवी धोबी – ९२.८०%
या गौरवाच्या क्षणी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, व पालकांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत, उपकार्याध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार, यशवंत साटम, सुरक्षा घोसाळकर, विजय खामकर आणि इंद्रायणी सावंत यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हीच उजळणी नव्या भारताच्या शिक्षणविकासाची आहे!
उत्कृष्टतेकडे वाटचाल करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे यश संपूर्ण जोगेश्वरीचा अभिमान वाढवणारे ठरले आहे.

04-29 - Nyay Ranbhumi - Monday 12th May To 18th May 2025

 

जवान कृतज्ञता दिनाचा रोमांचक सोहळा—देशभक्तीचा अनोखा जल्लोष!

विशेष प्रतिनिधी

१० मे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील पराक्रमी वीरजवानांच्या अमर स्मृतींना वंदन करण्यासाठी जवान कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत लोकमान्य सेवा संघ, पार्ले आयोजित "प्रणाम वीरा" कार्यक्रमात देशासाठी अतुलनीय सेवा बजावलेल्या वीरांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात ऑपरेशन पवनमध्ये विशेष योगदान असलेले सेवानिवृत्त सार्जंट (ॲड.) दत्तात्रय अर्जुन उतेकर (भारतीय हवाई दल) आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांना कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांनी यथोचित सन्मान दिला. संघ कार्यवाह डॉ. रश्मी फडणवीस यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

दिशा कर्णबधिर विद्यालयाच्या कार्यवाह सुरक्षा घोसाळकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा परिचय करून देण्याची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. सेवानिवृत्त सार्जंट दत्तात्रय अर्जुन उतेकर यांनी परमवीर चक्र विजेत्या वीरांची थरारक शौर्यगाथा उलगडली, ज्यामुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले.

वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी नागरिकांच्या जबाबदारी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिभा सराफ आणि दिलासा सदस्यांनी विविध समरगीते सादर करत देशभक्तीचा जागर केला.

"त्याग आणि समर्पणाची भावना असलेल्या शूरवीरांना कृतज्ञतेच्या अश्रूंनी सलाम!" असा भावनिक संदेश देत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

"भारतभूमीच्या वीरांना मानाचा मुजरा!"

हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर वीरांच्या त्यागाची आठवण जपणारा एक स्फूर्तिदायक क्षण होता. जय हिंद!