BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार होणार बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण मोफत उपचारांची योजना अवघ्या अडीच वर्षांत मागे घेण्यात आली असून आरोग्य विभागाने उपचारांसाठी नवीन शुल्कदर लागू केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ओपीडी तपासणीपासून विविध तपासण्या, शस्त्रक्रिया, आयसीयू, डायलिसिस, रुग्णवाहिका आदी सेवांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. मात्र ही शुल्कवाढ फार नसून अगदी नाममात्र आणि सर्वांना परवडणारीच असल्याचे नवीन शुल्कांवरून दिसून येत आहे.

* नवीन निर्णयानुसार ओपीडी केसपेपर नोंदणीसाठी ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
* रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी दररोज १० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
* शहरी भागात ओपीडीसाठी १० रुपये शुल्क पूर्वीपासून असले तरी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी सेवा मोफत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

तपासण्यांच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. एमआरआय स्कॅनसाठी १६०० रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे दर १२०० रुपये होते. डोक्याच्या सीटी स्कॅनसाठी ३०० रुपये, तर मणका, मान आणि छातीच्या सीटी स्कॅनसाठी ४०० रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे. या तपासण्यांचे दर पूर्वी तुलनेने कमी होते. हिमोग्लोबिन, टीएलसी, डीएलसी, रक्तगट, लघवी तपासणीसह प्रत्येक रक्ततपासणीसाठी १५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
भूल देऊन करण्यात येणाऱ्या लहान व मोठ्या शस्त्रक्रियांसाठी ६० ते १६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी हे सर्व उपचार पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी पूर्णतः मोफत होते.

मात्र आता या सवलती कायम राहणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
* गंभीर रुग्णांसाठी आयसीयू सेवेसाठी दररोज १०० रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे शुल्क ५० रुपये होते.
प्रत्येक डायलिसिससाठी १५० रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे.
* रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर ५ रुपये आकारले जाणार असून याआधी सरकारी रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध होती.
* प्रसूती सेवांबाबत पहिली प्रसूती मोफत राहणार आहे. मात्र दुसऱ्या प्रसूतीसाठी ५० रुपये आणि तिसऱ्या व पुढील प्रत्येक प्रसूतीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
* वातानुकूलित खोलीसाठी दररोज १५० रुपये, तर साधारण खोलीसाठी ७५ रुपये शुल्क असेल. मृतदेह एम्बाल्मिंगसाठी १५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ओपीडी व शस्त्रक्रिया मोफत असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिकारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कल्याण-डोंबिवलीत शिवजयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नवचर्चित महापालिका महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अति.आयुक्त हर्षल गायकवाड, अति.शहर अभियंता (विद्युत/यांत्रिकी) प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  महापौर हर्षाली विजय चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवलीतही राज्यगीताचे गायन करुन महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमहापौर राहुल दामले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या समयी उपस्थित उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर, भरत पवार, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या समयी महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्र.६८, धाकटे शहाड येथील शाळा क्र.३३ व उंबर्डे येथील शाळा क्र.१२ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या कडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने वागळे गुन्हे युनिट क्र.५ कडून जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे -  गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र. ५ कडून वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या इसमाकडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली आहेत.

वागळे इस्टेट पोलीस ठाणे, येथे गु.र.नं ४०/२०२६ भा. न्या. सं कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये दि. ०५/०२/२०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची ५ चारचाकी वाहने आरोपी नामे संदिप रघु शेट्टी, राहणार: उलवे, नवी मुंबई याने मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून कोणतेही भाडे न देता, तसेच त्यांची वाहने परत न देता त्या इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून, फिर्यादी यांच्या वाहनांचा अपहार करून त्यांची फसवणुक केली होती. तसेच आरोपी संदिप शे‌ट्टी हा स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता.

सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व तसेच गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून आरोपी संदिप रघु शेट्टी (वय: ३८ वर्ष) यास दि. ०६/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी शे‌ट्टीकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्याने अशाप्रकारे अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांची चारचाकी वाहने ताब्यात घेवून त्या परस्पर इतरांकडे गहाण ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सदरबाबत अधिक सखोल तपास केल्यानंतर आरोपीकडून सुमारे रु. २,४४,१५,०००/- रू. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली असून सदर वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त (शोध-१ गुन्हे) शेखर बागडे साो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सपोनिशरद पाटील, पोहवा. विजय काटकर, रोहिदास रावते, हर्षद तारी, संदिप शिंदे, पोना. तेजस ठाणेकर, सचिन बंडगर, पोकाँ. मिनीनाथ शिकारे, यश यादव या पथकाने केली आहे.

दिव्यातील ॐ म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

दिवा - दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ॐ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिव मंदिर दिवा आणि कोपर स्थानका दरम्यान खाडी किनारी असलेले पुरातन मंदिर आहे. या मंदिरात दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणची सगळी आगरी, कोळी आणि कोकणी माणसे श्रद्धेने पूजा करायला येतात.

या महाशिवरात्री महोत्सवात पहिल्या दिवशी सकाळच्या वेळी दातिवलीच्या प्रवचन गुरुभक्त प्रकाश महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. दुपारच्या वेळी ह.भ.प. गुरुवर्य शरद महाराज म्हात्रे यांच्या विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ, दातिवलीचे सुस्वर भजन होते. तसेच संध्याकाळी माऊली महिला हरिपाठ मंडळ (दातिवली) यांचे भजन तर गावदेवी भजन मंडळ, बेतवडे यांचे ही भजन झाले. 

तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, बेतवडे यांचे भजन झाल्यावर महादेवाची महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली. त्या नंतर महाप्रसाद सर्वांसाठी ठेवण्यात आला होता. हा महाशिवरात्री महोत्सव विना विघ्न पार पडण्यासाठी ॐ म्हातार्डेश्वर ट्रस्टी मंडळ व समस्त ग्रामस्थ (म्हातार्डी) अध्यक्ष सदाशिव शंकर पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत शंकर पाटील, सचिव जयदास कान्हा शेलार, खजिनदार गोवर्धन पाटील, सदस्य दिपक कान्हा शेलार, अशोक शेलार, वैद्यनाथ शेलार, मंगेश शेलार, शांताराम पाटील, भोलाराम शेलार, सुदेश पाटील यांनी मेहनत घेतली होती. तसेच स्वयंपाकी ग्रुप बेतवडे, द्वारकानाथ पाटील, जयदास पाटील, बाळाराम पाटील, नारायण पाटील, गणेश दळवी, नामदेव नाईक, गणेश पाटील आणि टीम यांनी ही जेवणाचे योग्य नियोजन करून नागरिकांसाठी प्रसाद आणि जेवण बनवले होते.
त्यावेळी आमदार राजेश मोरे, दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, साक्षी मढवी, विभाग प्रमुख राजेश पाटील, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, उपविभाग प्रमुख शंकर पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात वालधुनी नदीच्या स्वच्छता व सुशोभिकरणासाठी तरतूद करण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - वालधुनीनदी कल्याण व परिसर सफाई व सुशोभीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतुद करण्याची मागणी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी केडीएमसी च्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत पत्र दिले आहे. 

वालधुनी नदी ही बदलापूर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, कल्याण मार्गे खाडीला जाऊन मिळते. या नदीची लांबी सुमारे १३ कि.मी असून कल्याणच्या हद्दीतील लांबी सुमारे ४  कि.मी इतकी आहे. नदीच्या सफाई बाबत तसेच परिसर सुशोभिकरणाबाबत समितीमार्फत गेली अनेक वर्ष पाठपुरावा केला जात आहे. कल्याण-डोबिवली महानगरपालिकेमार्फत वालधुनी नदीला मिळणारे नाले प्रत्येक वर्षी साफ करण्यात येतात. तथापि प्रत्यक्ष नदी पात्राच्या आवारात सफाई अथवा कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. ही बाब पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याबाबत, केडीएमसीला कामे करण्यास अडचंणी येत आहेत.

नदीच्या पात्रात एमआयडीसी मधील कारखाने केमिकलयुक्त पाणी प्रक्रियेविना सोडतात. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील समिती पाठपुरावा करत आहे. कल्याण परिसरातील नदी किनाऱ्याची  सफाई व सुशोभीकरण झाल्यास, कल्याणच्या नागरिकांना या ठिकाणी एक चांगले विरंगुळ्याचे स्थान निर्माण होऊ शकेल व या परिसरातील टाकण्यात येणारा कचरा, डेब्रिज देखील उचलले जाऊन परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने या कामासाठी प्रथम टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन उपरोक्त काम पाटबंधारे विभागास करण्यास आदेशित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोळसेवाडी पोलीसांनी वाहन चोरीतील आरोपींना केले काही तासांतच जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - दिनांक १२/०२/२०२६ रोजी रात्रौ १०:०० वाजता  ते दिनांक १३/०२/२०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता च्या दरम्यान पत्रीपुल जवळील सार्वजनिक शौचालयाचे बाजुला कल्याण (पुर्व) येथे सार्वजनिक रोड लगत इसम नामे-सलमान जाहीद सि‌द्दीकी (वय:२१ वर्षे) धंदा: रिक्षाचालक, राहणार: वाघमारे चौरे चाळ, रूम नं.८१, गफर डॉन स्कुलचे समोर, पत्रीपुल जवळ, कल्याण (पुर्व) यांनी त्यांची ७०,०००/-रू. किंमतीची सुझुकी कंपनीची एव्हीनेक्स मोटरसायकल MH-05/FU-0658 ही पार्क करून ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली असल्याची म्हणुन तकार दिल्याने कोळसेवाडी पोलीस ठाणे, गु.रजि नं.८०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे सुचक नाका परिसरात फिरत असल्याची पोहवा. विशाल वाघ यांना बातमी मिळाल्याने, लागलीच पोलीस पथक रवाना होवुन, संशयीत आरोपींचा शोध घेत असताना, संशयीत आरोपी १) आशु संतोष सिंग (वय: २३ वर्षे), राहणार: रूम नं.०३, मातृ छाया बंगला, विठ्ठल मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व), 
२) अमन राधेश्याम जयस्वाल (वय: २३ वर्षे), राहणार: रूम नं.०२, दयानंद ठाकुर चाळ, हनुमान मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व) हे प्रबोधनकार शाळेच्या मागे, नेतीवली, कल्याण (पुर्व) येथे सापडल्याने, त्यांना नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. 
नमुद आरोपी यांना अटक करून, त्यांच्याकडे अधिक तपास करता, त्यांनी १) हिललाईन पो. ठाणे, गु.र.नं.५०८/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे, २) राबोडी पो.ठाणे.गु.र.नं.३९१/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले असुन, त्यांच्याकडुन सदर गुन्ह्यातील चोरीची १) ७०,०००/- रू किंमतीची सुझुकी कंपनीची एव्हीनेक्स मोटरसायकल MH- 05/FU-0658, 
२) ९०,०००/-रू किंमतीची सुझुकी कंपनीची काळया रंगाची ऍक्सेस १२५ स्कूटर क्रमांक MH-05/BG-2881, 
३) १,८०,०००/-रू किंमतीची बजाज कंपनिची काळया रंगाची रिक्षा क्रमांक MH-04/LX-2738 अशी एकूण ३,४०,०००/- रू. किंमतीची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. विशाल वाघ, कोळसेवाडी पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडल-३ कल्याण, अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गणेश न्हायदे कोळसेवाडी पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आव्हाड, दत्तु जाधव, पोना. दिलीप कोती, पोशि. राहुल खरे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.

'यूपीआय' च्या नवीन नियमानुसार आता प्रत्येक ₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाणार ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - युपीआय च्या नवीन नियमानुसार डिजिटल इंडियाच्या युगात यूपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चहाच्या टपऱ्यांपासून मोठ्या शोरूमपर्यंत आपण सर्वत्र स्कॅन करून पेमेंट करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ₹१,००० च्या यूपीआय ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल अशा बातम्या व्हायरल होत आहेत. तुमचा खिसा खरोखरच लुटला जाणार आहे का, की ही फक्त अफवा आहे ? चला, सत्य जाणून घेऊया.

₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल का ? साधे आणि स्पष्ट उत्तर..नाही !.. सामान्य ग्राहकांसाठी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात होणारे पीटूपी (व्यक्ती ते व्यक्ती) ट्रान्सफर अजूनही पूर्णपणे मोफत आहेत. एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने स्पष्ट केले आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्यातून मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या खात्यात पैसे पाठवले, मग ती रक्कम ₹१,००० असो किंवा ₹१०,०००, तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. Google Pay, PhonePe किंवा Paytm द्वारे केलेले सामान्य यूपीआय पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. मग हे शुल्क कुठून आले ? 'एनपीसीआय' ने 'पीपीआय' (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) म्हणजेच वॉलेट व्यवहारांसाठी इंटरचेंज फी लागू केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.

सोप्या भाषेत: वॉलेट व्यवहार: जर तुम्ही Paytm Wallet, Amazon Pay Wallet किंवा PhonePe Wallet वापरून व्यापाऱ्याला ₹२,००० पेक्षा जास्त पेमेंट केले, तर व्यापाऱ्याला शुल्क लागू होऊ शकते. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत. हा शुल्क व्यापारी आणि बँकेमधील बाब आहे.

यूपीआय बद्दल माहित असाव्यात अशा ३ गोष्टी

दैनिक मर्यादा : बहुतेक बँका दररोज ₹१ लाखपर्यंत यूपीआय व्यवहारांना परवानगी देतात. काही बँका फसवणूक टाळण्यासाठी लहान व्यवहारांसाठी ₹२,००० ची मर्यादा ठेवतात.

यूपीआय लाईट : जर तुम्ही वारंवार ₹५०० पेक्षा कमी रकमेची छोटी पेमेंट करत असाल, तर यूपीआय लाईट वापरा. पेमेंट पिन न टाकता व्यवहार होतो आणि बँक स्टेटमेंटमध्ये गर्दी होत नाही.

घोटाळे टाळा : पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते. कोणी पैसे पाठवण्याच्या नावाखाली पिन मागत असेल, तर ती फसवणूक आहे.

प्रत्येक ₹१,००० वर शुल्क आकारल्याबद्दल सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या फक्त क्लिकबेट किंवा अफवा आहेत. 'भारत सरकार' आणि एनपीसीआय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सध्या सामान्य वापरकर्त्यांसाठी यूपीआय शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही. निर्धास्तपणे यूपीआय वापरत रहा.