BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या कडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने वागळे गुन्हे युनिट क्र.५ कडून जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे -  गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र. ५ कडून वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या इसमाकडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली आहेत.

वागळे इस्टेट पोलीस ठाणे, येथे गु.र.नं ४०/२०२६ भा. न्या. सं कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये दि. ०५/०२/२०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची ५ चारचाकी वाहने आरोपी नामे संदिप रघु शेट्टी, राहणार: उलवे, नवी मुंबई याने मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून कोणतेही भाडे न देता, तसेच त्यांची वाहने परत न देता त्या इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून, फिर्यादी यांच्या वाहनांचा अपहार करून त्यांची फसवणुक केली होती. तसेच आरोपी संदिप शे‌ट्टी हा स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता.

सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व तसेच गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून आरोपी संदिप रघु शेट्टी (वय: ३८ वर्ष) यास दि. ०६/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी शे‌ट्टीकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्याने अशाप्रकारे अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांची चारचाकी वाहने ताब्यात घेवून त्या परस्पर इतरांकडे गहाण ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सदरबाबत अधिक सखोल तपास केल्यानंतर आरोपीकडून सुमारे रु. २,४४,१५,०००/- रू. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली असून सदर वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त (शोध-१ गुन्हे) शेखर बागडे साो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सपोनिशरद पाटील, पोहवा. विजय काटकर, रोहिदास रावते, हर्षद तारी, संदिप शिंदे, पोना. तेजस ठाणेकर, सचिन बंडगर, पोकाँ. मिनीनाथ शिकारे, यश यादव या पथकाने केली आहे.

दिव्यातील ॐ म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

दिवा - दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ॐ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिव मंदिर दिवा आणि कोपर स्थानका दरम्यान खाडी किनारी असलेले पुरातन मंदिर आहे. या मंदिरात दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणची सगळी आगरी, कोळी आणि कोकणी माणसे श्रद्धेने पूजा करायला येतात.

या महाशिवरात्री महोत्सवात पहिल्या दिवशी सकाळच्या वेळी दातिवलीच्या प्रवचन गुरुभक्त प्रकाश महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. दुपारच्या वेळी ह.भ.प. गुरुवर्य शरद महाराज म्हात्रे यांच्या विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ, दातिवलीचे सुस्वर भजन होते. तसेच संध्याकाळी माऊली महिला हरिपाठ मंडळ (दातिवली) यांचे भजन तर गावदेवी भजन मंडळ, बेतवडे यांचे ही भजन झाले. 

तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, बेतवडे यांचे भजन झाल्यावर महादेवाची महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली. त्या नंतर महाप्रसाद सर्वांसाठी ठेवण्यात आला होता. हा महाशिवरात्री महोत्सव विना विघ्न पार पडण्यासाठी ॐ म्हातार्डेश्वर ट्रस्टी मंडळ व समस्त ग्रामस्थ (म्हातार्डी) अध्यक्ष सदाशिव शंकर पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत शंकर पाटील, सचिव जयदास कान्हा शेलार, खजिनदार गोवर्धन पाटील, सदस्य दिपक कान्हा शेलार, अशोक शेलार, वैद्यनाथ शेलार, मंगेश शेलार, शांताराम पाटील, भोलाराम शेलार, सुदेश पाटील यांनी मेहनत घेतली होती. तसेच स्वयंपाकी ग्रुप बेतवडे, द्वारकानाथ पाटील, जयदास पाटील, बाळाराम पाटील, नारायण पाटील, गणेश दळवी, नामदेव नाईक, गणेश पाटील आणि टीम यांनी ही जेवणाचे योग्य नियोजन करून नागरिकांसाठी प्रसाद आणि जेवण बनवले होते.
त्यावेळी आमदार राजेश मोरे, दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, साक्षी मढवी, विभाग प्रमुख राजेश पाटील, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, उपविभाग प्रमुख शंकर पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात वालधुनी नदीच्या स्वच्छता व सुशोभिकरणासाठी तरतूद करण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - वालधुनीनदी कल्याण व परिसर सफाई व सुशोभीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतुद करण्याची मागणी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी केडीएमसी च्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत पत्र दिले आहे. 

वालधुनी नदी ही बदलापूर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, कल्याण मार्गे खाडीला जाऊन मिळते. या नदीची लांबी सुमारे १३ कि.मी असून कल्याणच्या हद्दीतील लांबी सुमारे ४  कि.मी इतकी आहे. नदीच्या सफाई बाबत तसेच परिसर सुशोभिकरणाबाबत समितीमार्फत गेली अनेक वर्ष पाठपुरावा केला जात आहे. कल्याण-डोबिवली महानगरपालिकेमार्फत वालधुनी नदीला मिळणारे नाले प्रत्येक वर्षी साफ करण्यात येतात. तथापि प्रत्यक्ष नदी पात्राच्या आवारात सफाई अथवा कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. ही बाब पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याबाबत, केडीएमसीला कामे करण्यास अडचंणी येत आहेत.

नदीच्या पात्रात एमआयडीसी मधील कारखाने केमिकलयुक्त पाणी प्रक्रियेविना सोडतात. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील समिती पाठपुरावा करत आहे. कल्याण परिसरातील नदी किनाऱ्याची  सफाई व सुशोभीकरण झाल्यास, कल्याणच्या नागरिकांना या ठिकाणी एक चांगले विरंगुळ्याचे स्थान निर्माण होऊ शकेल व या परिसरातील टाकण्यात येणारा कचरा, डेब्रिज देखील उचलले जाऊन परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने या कामासाठी प्रथम टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन उपरोक्त काम पाटबंधारे विभागास करण्यास आदेशित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोळसेवाडी पोलीसांनी वाहन चोरीतील आरोपींना केले काही तासांतच जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - दिनांक १२/०२/२०२६ रोजी रात्रौ १०:०० वाजता  ते दिनांक १३/०२/२०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता च्या दरम्यान पत्रीपुल जवळील सार्वजनिक शौचालयाचे बाजुला कल्याण (पुर्व) येथे सार्वजनिक रोड लगत इसम नामे-सलमान जाहीद सि‌द्दीकी (वय:२१ वर्षे) धंदा: रिक्षाचालक, राहणार: वाघमारे चौरे चाळ, रूम नं.८१, गफर डॉन स्कुलचे समोर, पत्रीपुल जवळ, कल्याण (पुर्व) यांनी त्यांची ७०,०००/-रू. किंमतीची सुझुकी कंपनीची एव्हीनेक्स मोटरसायकल MH-05/FU-0658 ही पार्क करून ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली असल्याची म्हणुन तकार दिल्याने कोळसेवाडी पोलीस ठाणे, गु.रजि नं.८०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे सुचक नाका परिसरात फिरत असल्याची पोहवा. विशाल वाघ यांना बातमी मिळाल्याने, लागलीच पोलीस पथक रवाना होवुन, संशयीत आरोपींचा शोध घेत असताना, संशयीत आरोपी १) आशु संतोष सिंग (वय: २३ वर्षे), राहणार: रूम नं.०३, मातृ छाया बंगला, विठ्ठल मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व), 
२) अमन राधेश्याम जयस्वाल (वय: २३ वर्षे), राहणार: रूम नं.०२, दयानंद ठाकुर चाळ, हनुमान मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व) हे प्रबोधनकार शाळेच्या मागे, नेतीवली, कल्याण (पुर्व) येथे सापडल्याने, त्यांना नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. 
नमुद आरोपी यांना अटक करून, त्यांच्याकडे अधिक तपास करता, त्यांनी १) हिललाईन पो. ठाणे, गु.र.नं.५०८/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे, २) राबोडी पो.ठाणे.गु.र.नं.३९१/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले असुन, त्यांच्याकडुन सदर गुन्ह्यातील चोरीची १) ७०,०००/- रू किंमतीची सुझुकी कंपनीची एव्हीनेक्स मोटरसायकल MH- 05/FU-0658, 
२) ९०,०००/-रू किंमतीची सुझुकी कंपनीची काळया रंगाची ऍक्सेस १२५ स्कूटर क्रमांक MH-05/BG-2881, 
३) १,८०,०००/-रू किंमतीची बजाज कंपनिची काळया रंगाची रिक्षा क्रमांक MH-04/LX-2738 अशी एकूण ३,४०,०००/- रू. किंमतीची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. विशाल वाघ, कोळसेवाडी पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडल-३ कल्याण, अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गणेश न्हायदे कोळसेवाडी पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आव्हाड, दत्तु जाधव, पोना. दिलीप कोती, पोशि. राहुल खरे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.

'यूपीआय' च्या नवीन नियमानुसार आता प्रत्येक ₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाणार ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - युपीआय च्या नवीन नियमानुसार डिजिटल इंडियाच्या युगात यूपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चहाच्या टपऱ्यांपासून मोठ्या शोरूमपर्यंत आपण सर्वत्र स्कॅन करून पेमेंट करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ₹१,००० च्या यूपीआय ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल अशा बातम्या व्हायरल होत आहेत. तुमचा खिसा खरोखरच लुटला जाणार आहे का, की ही फक्त अफवा आहे ? चला, सत्य जाणून घेऊया.

₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल का ? साधे आणि स्पष्ट उत्तर..नाही !.. सामान्य ग्राहकांसाठी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात होणारे पीटूपी (व्यक्ती ते व्यक्ती) ट्रान्सफर अजूनही पूर्णपणे मोफत आहेत. एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने स्पष्ट केले आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्यातून मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या खात्यात पैसे पाठवले, मग ती रक्कम ₹१,००० असो किंवा ₹१०,०००, तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. Google Pay, PhonePe किंवा Paytm द्वारे केलेले सामान्य यूपीआय पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. मग हे शुल्क कुठून आले ? 'एनपीसीआय' ने 'पीपीआय' (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) म्हणजेच वॉलेट व्यवहारांसाठी इंटरचेंज फी लागू केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.

सोप्या भाषेत: वॉलेट व्यवहार: जर तुम्ही Paytm Wallet, Amazon Pay Wallet किंवा PhonePe Wallet वापरून व्यापाऱ्याला ₹२,००० पेक्षा जास्त पेमेंट केले, तर व्यापाऱ्याला शुल्क लागू होऊ शकते. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत. हा शुल्क व्यापारी आणि बँकेमधील बाब आहे.

यूपीआय बद्दल माहित असाव्यात अशा ३ गोष्टी

दैनिक मर्यादा : बहुतेक बँका दररोज ₹१ लाखपर्यंत यूपीआय व्यवहारांना परवानगी देतात. काही बँका फसवणूक टाळण्यासाठी लहान व्यवहारांसाठी ₹२,००० ची मर्यादा ठेवतात.

यूपीआय लाईट : जर तुम्ही वारंवार ₹५०० पेक्षा कमी रकमेची छोटी पेमेंट करत असाल, तर यूपीआय लाईट वापरा. पेमेंट पिन न टाकता व्यवहार होतो आणि बँक स्टेटमेंटमध्ये गर्दी होत नाही.

घोटाळे टाळा : पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते. कोणी पैसे पाठवण्याच्या नावाखाली पिन मागत असेल, तर ती फसवणूक आहे.

प्रत्येक ₹१,००० वर शुल्क आकारल्याबद्दल सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या फक्त क्लिकबेट किंवा अफवा आहेत. 'भारत सरकार' आणि एनपीसीआय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सध्या सामान्य वापरकर्त्यांसाठी यूपीआय शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही. निर्धास्तपणे यूपीआय वापरत रहा.

नायजेरियन नागरिकासह दोन तस्करांकडून एमडी-कोकेनसह एकूण २ कोटी १५ लाख ८० हजारांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करत ड्रग्ज रॅकेटचा केला भांडाफोड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात नायजेरियन तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं पोलीसांच्या कारवाईत उघड झालं आहे. डोंबिवली जवळील उंबार्ली गणेशनगर परिसरात पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एक नायजेरियन नागरिकासह अंबरनाथमधील दोन तस्करांना रंगेहाथ पकडलं. या तिघांकडून मेफोड्रोन आणि कोकेन या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी १५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती कल्याण विभाग परिमंडल-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

मागील वर्षभरात १४६ तस्करांना अटक

मागील वर्षभरात कल्याण-डोंबिवली शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करांकडून ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १११ ग्रॅम चरस, १८०० कोडीनयुक्त बाटल्या, निंदिया गोळ्या, निट्राझेपम गोळ्या तसेच ४ किलो १४७ ग्रॅम एमडी पावडरचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, देवरे आणि खरसाण यांचे पथक शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) डोंबिवली-शिळफाटा रस्त्यालगत उंबार्ली गाव हद्दीतील गणेशनगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी तीन इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यापैकी एक जण नायजेरियन नागरिक असल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला.
१७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अविनाश व्यंकटेशन सदरला (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथ पश्चिम येथील पनवेलकर आयकॉन सोसायटीत राहतो. गजेंद्रन संजीव नायडू (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथमधील नवरे पार्क, चिंचपाडा येथील दोस्ती कॉलनीमध्ये राहतो. त्यांच्यासोबत एक नायजेरियन नागरिक असून तो पलावा सिटी या हायप्रोफाईल सोसायटीत मागील २ ते ३ वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या तिघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन (एम.डी.) साठा, १५ लाख रुपये किमतीचे कोकेन, २१ हजार रुपये रोख रक्कम तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली.

दरम्यान, पोलीस त्यांच्या दिशेनं येत असल्याचं पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी तत्काळ झडप घालून त्यांना पकडले. अंगझडती आणि दुचाकीच्या डिकीची तपासणी केली असता एम.डी. पावडर व कोकेनचा साठा आढळून आला. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढे त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कारवाईमुळे तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

दरम्यान, मागील वर्षभरात कल्याण पोलीस परिमंडल-३ अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोन प्रकरणांमध्ये तस्करांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षात कल्याण पोलीस परिमंडळानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन आंतरराज्य टोळ्यांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान गांजा, चरस, कोडीनयुक्त सिरपच्या बाटल्या, निंदिया गोळ्या तसेच निट्राझेपम गोळ्या असा साठा जप्त करण्यात आला. या कठोर कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सेंटर ऑफ 'एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग' साठी कोलंबिया विद्यापीठ - आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 
   
नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यात आयआयटी मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया-आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आला.

हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) हब म्हणून कार्य करेल. वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली विकसित करण्यावर त्याचा भर असेल, ज्यामुळे भारतातील नवोन्मेष परिसंस्था आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदारही प्रक्रियेत आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आतापर्यंत चार वेगवेगळी एआय केंद्रे सुरू केली आहेत. ‘कोलंबिया-आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ हे संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) केंद्र असून, वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित 'एआय' प्रणाली विकसित करण्याचा त्याचा उद्देश आहे. या केंद्रात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदार सध्या प्रक्रियेत आहेत.