BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

मजदूर संघटनेच्या माध्यमातून नाका कामगारांना 'सुरक्षा संच' (सेफ्टी किट) चे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील लेवा भवन सभागृहात नाका कामगारांना शासन योजनेंतर्गत गृहोपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच, सुरक्षा संच (सेफ्टी कीट) ज्या कामगार कार्यालयात ऑनलाईन नोंदणी झालेल्या आहेत, त्या कामगारांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, प्रसिद्ध कलाकार अक्षदा दास, समाजसेवक समीर जगे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, रिपाइंचे माणिक उघडे, मीना साळवे, समाधान तायडे, दिलखुश माळी, शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव, रेश्मा चिकटे, संघटनेचे सहखजिनदार रामचंद्र वाघ, संघटनेचे केंद्रीय कमिटी सदस्य रामेश्वर शेजूळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोंदणीकृत नाका कामगारांना गृहउपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच देण्यात येते. परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे म्हणाले की, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नेहमीच नाका कामगारांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. संघटनेच्या प्रयत्नात यश येत असून आजवर अनेक नाका कामगारांना याचा लाभ मिळाला आहे.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 'इंडोनेशिया' शिष्टमंडळाचे नेतृत्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळा-मधीला सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवि-ण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप मध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून इंडोनेशिया दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ते करणार आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगातील पातळीवर मांडत होते. या मोहिमेत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत युएई, सिएरा लियोन, लायबेरिया आणि डी आर काँगो या देशांना भेट देत भारताची ठाम भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या संयमी, अभ्यासू आणि ठाम मांडणीमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी मिळाल्याचे मानले गेले. यापूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि वाहतूक प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टीव्ही वाढविणे, मेट्रो व रेल्वे प्रकल्पांना गती देणे, तसेच मतदारसंघातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.

युवा खासदार म्हणून संसदेतील सक्रिय उपस्थिती, विकासाभिमुख भूमिका आणि आंतरराष्ट्रीय विषयावरील अभ्यासू मांडणी यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 'पार्लेमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'च्या माध्यमातून भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हून अधिक देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री यांना थेट निवेदन देत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

आरोग्य सेवांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले असून, पालिकेच्या रुग्णालयांत सर्दी-खोकल्यापलीकडे उपचार मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच पालिका शाळांचा दर्जा घसरल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, गटारांची दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काही कर्मचारी गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे, तर राजकीय पाठबळ असलेले कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे आयुक्तांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, केडीएमसीमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक प्रतिमेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लक्ष्मण हजारे, दिलीप मगर या नागरिकांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

'युजीसी' (UGC) कडून बनावट विद्यापीठांची यादी जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एआय (AI) परिषदेत नोएडातील गलगोटीया या खाजगी विद्यापीठाने चीनी बनावटीचा रोबो कुत्रा आपणच तयार केल्याची मल्लीनाथी केल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यापीठाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी जगभर यामुळे भारताची बदनामी झाली आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक चिंतीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युजीसी (UGC) कडून देशभरातील बनावट विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. युजीसी (UGC) देशातील १२ राज्यांमध्ये पसरलेल्या ३२ बनावट विद्यापीठांची ओळख पटवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या २ वर्षांत अशा अनधिकृत संस्थांची संख्या २० वरून थेट ३२ वर पोहोचली आहे. या संस्थांना पदवी देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रवेशाचा हंगाम जवळ येत असल्याने, विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यापीठात नाव नोंदवण्यापूर्वी 'यूजीसी' (UGC) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या संस्थेची मान्यता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकट्या दिल्लीत १२ बनावट विद्यापीठे सुरू आहेत. यामध्ये ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍण्ड फिजिकल हेल्थ सायन्सेस’, ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’ आणि ‘विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी’ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील काही संस्था तर सरकारी नियामक कार्यालयांच्या अगदी जवळ कार्यरत आहेत.

यूजीसी (UGC) ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही अनेक बोगस संस्था सक्रिय आहेत. यामध्ये प्रयागचे ‘गांधी हिंदी विद्यापीठ’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ यांचा समावेश आहे. या यादीत आता हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचीही भर पडली आहे. महाराष्ट्रातही काही संस्थांना बोगस घोषित करण्यात आले असून कर्नाटकच्या बेंगळुरूमधील ‘ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी’ बाबत विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ढोल ताशांच्या गजरात रंगला शिवजयंती उत्सव सोहळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) -  'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' अशा घोषवाक्याने अंगातील रक्त सळसळते तीच तरुणाई म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा मराठी माणूस. दिनांक १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी मिळालेले एक सोनेरी पान आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये देखील वन्दे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे, नगरसेवक विश्वनाथ राणे, पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी कार्यकर्ते यांनी पालखी मधून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पालखी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच आरती ओवाळून व फुलांचा वर्षाव करत 'जे एम एफ' मंडपम मध्ये विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या नादात पालखीचे आगमन केले. 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषात सारा आसमंत दुमदुमून गेला. 'जे एम एफ' संस्थेची आठ मजली इमारत एखाद्या किल्ल्याप्रमाणे सजवली होती.
सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मराठमोळा वेष परिधान करून आले होते त्यामुळे 'जे एम एफ' च्या आवराला  खरोखरच शिवनेरी किल्ल्याचे स्वरूप आले होते. शिवाजी महाराजांची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून "झुलवा पाळणा" गाणे म्हणत सर्वांनी पाळणा झुलवला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा बाणा आहे, 'शिवाजी जन्मावा, पण दुसऱ्याच्या घरात'..अशी म्हण आहे पण प्रत्येक आईला वाटत असते आपला मुलगा शिवबा असावा, जिजाबाईने शिवबा ला शिवाजी केले आणि त्यांच्या पराक्रमाने मावळ्यांनी शिवाजीला शिवाजी महाराज केले, शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करून आहेत पण केवळ मनात असून चालणार नाही तर ते आचरणात आणणे देखील महत्त्वाचे आहे, त्यांच्या सारखे कामाप्रती एकनिष्ठ, न्यायप्रिय, आदरणीय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  समर्थ रामदास स्वामींनी 'निश्चयाचा महामेरू,l बहुत जनांसी आधारु'lअखंड स्थितीचा निर्धारू,l श्रीमंत योगी lअशी त्यांना उपाधी दिली गेली आहे तसेच आपण देखील  त्यांच्या सारखीच निश्चयाने, निर्णयाने वागणूक ठेवा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित तरुणाईला सांगितले.
जिजाबाई होत्या म्हणून आज शिवाजी घडला, दादोजी कोंडदेव सारखे गुरु त्यांना लाभले तर जीवास जीव देणारे सखा मित्र मावळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले, आणि इतिहास घडला. त्यांच्या सारखेच तुम्ही देखील संकटांना सामोरे जाण्याचे साहस दाखवा आणि तुमचा इतिहास घडवा असे  सांगून संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी तरुणाईला प्रेरित केले.
   गेले एक महिन्यापासून शिवजयंतीच्या तयारीला झटलेले वैभव मंडल, पराग सुतार, यश बडेकर, साहिल सिंग, साई कुडतडकर, किमया म्हात्रे, वेदिका राजदेव, सार्थक गवळी, वैभव पाचकर , शुभम शिंदे, राकेश प्रधान, सूर्यावसंथरा, मयांक कोठारी, तन्वी गुरव, निधी अमीन, तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय असे शेकडो व नामनिर्देशित केलेल्या  या सर्व होतकरू विद्यार्थांनी मनापासून शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची तयारी करून मोठ्या उत्साहात आणि शिवगर्जनेत शिवजयंती साजरी केली.

मायभूमी ग्राम विकास संस्थेमार्फत शिवणे येथे वॉलनट स्कूल चे सुरक्षित-असुरक्षित स्पर्श जनजागृती सत्र..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवणे - 'मायभूमी ग्राम विकास संस्था' यांच्या पुढाकारातून वॉलनट स्कूलच्या सहकार्याने शिवणे येथे इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांसाठी “सुरक्षित व असुरक्षित स्पर्श” या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. बालसुरक्षेबाबत लहान वयातच जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना स्वसंरक्षणाची मूलभूत कौशल्ये देणे हा मायभूमी ग्राम विकास संस्थेचा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.

या सत्राचे मार्गदर्शन मायभूमी ग्राम विकास संस्थेचे उपाध्यक्ष, प्रशिक्षक व बालहक्क कार्यकर्ते श्री. प्रमोद पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा करत “माझे शरीर माझे आहे” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश प्रभावीपणे दिला. शरीरातील खाजगी अवयव कोणते, त्यांना कोणालाही स्पर्श करू द्यायचा नाही आणि आपणही कोणाच्या खाजगी अवयवाला स्पर्श करायचा नाही, हे त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट केले. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श आणि गोंधळात टाकणारा स्पर्श यातील फरक उदाहरणांसह समजावून सांगत मुलांना संभाव्य धोक्यांविषयी सजग राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांना अस्वस्थ किंवा धोकादायक परिस्थितीत “NO” म्हणणे, त्वरित त्या ठिकाणाहून दूर जाणे "GO" आणि विश्वासातील मोठ्या व्यक्तीला सांगणे "TELL" या तीन महत्त्वपूर्ण कृतींबाबत माहिती देण्यात आली. तसेच “सुरक्षित वर्तुळ” या संकल्पनेद्वारे मुलांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तींची ओळख करून देत मदत कशी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मायभूमी ग्राम विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये बाललैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटनांविषयी आवश्यक जागरूकता निर्माण होत असून, सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श ओळखण्याची क्षमता वाढत आहे. या सत्रानंतर मुले घरी पालकांशी संवाद साधतील, ज्यामुळे पालकांनाही या विषयाचे गांभीर्य समजून कुटुंब पातळीवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास चालना मिळेल. मुलं आणि पालक दोघांमध्येही विश्वास, संवाद आणि सजगता वाढवणे हे मायभूमी ग्राम विकास संस्थेचे मुख्य ध्येय आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष अस्मिता रेपे,  उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव संतोष रेपे, सदस्य अंकुश रेपे व काजल पाटील काम करत आहेत.

या सत्राला शाळेचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. मुख्याध्यापिका राजश्री व्यंकटेश, मुख्य प्रशासक श्वेता मोहोळ, उपमुख्याध्यापिका अमृता दशपूत्रे व शिक्षकवर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृती कार्यक्रमांसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सत्र अधिक प्रभावी बनवले.

मायभूमी ग्राम विकास संस्था भविष्यातही बालसुरक्षा, बालहक्क आणि कुटुंब सक्षमीकरण या विषयांवर सातत्याने कार्य करत राहणार असून समाजात सुरक्षित आणि सशक्त बालपण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू; अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २० फेब्रुवारी – दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय: ३७ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपअभियंता दीपक पांडे (३०) आणि ठेकेदार राहुल पांचाळ (३३) या दोघांविरोधात मृताचे बंधू भंवरलाल रावल याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकाच्या होम फलाट वरील तिकीट काऊंटर बाहेरील भागात २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.१० च्या सुमारास अर्थिंगसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना खंगाराम रावल यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे राहणारे खंगाराम हे खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.

खंगाराम यांच्या मृत्यूप्रकरणी दीपक पांडे आणि राहुल पांचाळ या दोघांनी खंगाराम यांना कोणतेही सेफ्टी उपकरण न पुरविल्यामुळे हयगय व निष्काळजीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.