BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ढोल ताशांच्या गजरात रंगला शिवजयंती उत्सव सोहळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) -  'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' अशा घोषवाक्याने अंगातील रक्त सळसळते तीच तरुणाई म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा मराठी माणूस. दिनांक १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी मिळालेले एक सोनेरी पान आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये देखील वन्दे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे, नगरसेवक विश्वनाथ राणे, पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी कार्यकर्ते यांनी पालखी मधून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पालखी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच आरती ओवाळून व फुलांचा वर्षाव करत 'जे एम एफ' मंडपम मध्ये विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या नादात पालखीचे आगमन केले. 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषात सारा आसमंत दुमदुमून गेला. 'जे एम एफ' संस्थेची आठ मजली इमारत एखाद्या किल्ल्याप्रमाणे सजवली होती.
सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मराठमोळा वेष परिधान करून आले होते त्यामुळे 'जे एम एफ' च्या आवराला  खरोखरच शिवनेरी किल्ल्याचे स्वरूप आले होते. शिवाजी महाराजांची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून "झुलवा पाळणा" गाणे म्हणत सर्वांनी पाळणा झुलवला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा बाणा आहे, 'शिवाजी जन्मावा, पण दुसऱ्याच्या घरात'..अशी म्हण आहे पण प्रत्येक आईला वाटत असते आपला मुलगा शिवबा असावा, जिजाबाईने शिवबा ला शिवाजी केले आणि त्यांच्या पराक्रमाने मावळ्यांनी शिवाजीला शिवाजी महाराज केले, शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करून आहेत पण केवळ मनात असून चालणार नाही तर ते आचरणात आणणे देखील महत्त्वाचे आहे, त्यांच्या सारखे कामाप्रती एकनिष्ठ, न्यायप्रिय, आदरणीय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  समर्थ रामदास स्वामींनी 'निश्चयाचा महामेरू,l बहुत जनांसी आधारु'lअखंड स्थितीचा निर्धारू,l श्रीमंत योगी lअशी त्यांना उपाधी दिली गेली आहे तसेच आपण देखील  त्यांच्या सारखीच निश्चयाने, निर्णयाने वागणूक ठेवा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित तरुणाईला सांगितले.
जिजाबाई होत्या म्हणून आज शिवाजी घडला, दादोजी कोंडदेव सारखे गुरु त्यांना लाभले तर जीवास जीव देणारे सखा मित्र मावळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले, आणि इतिहास घडला. त्यांच्या सारखेच तुम्ही देखील संकटांना सामोरे जाण्याचे साहस दाखवा आणि तुमचा इतिहास घडवा असे  सांगून संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी तरुणाईला प्रेरित केले.
   गेले एक महिन्यापासून शिवजयंतीच्या तयारीला झटलेले वैभव मंडल, पराग सुतार, यश बडेकर, साहिल सिंग, साई कुडतडकर, किमया म्हात्रे, वेदिका राजदेव, सार्थक गवळी, वैभव पाचकर , शुभम शिंदे, राकेश प्रधान, सूर्यावसंथरा, मयांक कोठारी, तन्वी गुरव, निधी अमीन, तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय असे शेकडो व नामनिर्देशित केलेल्या  या सर्व होतकरू विद्यार्थांनी मनापासून शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची तयारी करून मोठ्या उत्साहात आणि शिवगर्जनेत शिवजयंती साजरी केली.

मायभूमी ग्राम विकास संस्थेमार्फत शिवणे येथे वॉलनट स्कूल चे सुरक्षित-असुरक्षित स्पर्श जनजागृती सत्र..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवणे - 'मायभूमी ग्राम विकास संस्था' यांच्या पुढाकारातून वॉलनट स्कूलच्या सहकार्याने शिवणे येथे इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांसाठी “सुरक्षित व असुरक्षित स्पर्श” या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. बालसुरक्षेबाबत लहान वयातच जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना स्वसंरक्षणाची मूलभूत कौशल्ये देणे हा मायभूमी ग्राम विकास संस्थेचा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.

या सत्राचे मार्गदर्शन मायभूमी ग्राम विकास संस्थेचे उपाध्यक्ष, प्रशिक्षक व बालहक्क कार्यकर्ते श्री. प्रमोद पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा करत “माझे शरीर माझे आहे” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश प्रभावीपणे दिला. शरीरातील खाजगी अवयव कोणते, त्यांना कोणालाही स्पर्श करू द्यायचा नाही आणि आपणही कोणाच्या खाजगी अवयवाला स्पर्श करायचा नाही, हे त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट केले. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श आणि गोंधळात टाकणारा स्पर्श यातील फरक उदाहरणांसह समजावून सांगत मुलांना संभाव्य धोक्यांविषयी सजग राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांना अस्वस्थ किंवा धोकादायक परिस्थितीत “NO” म्हणणे, त्वरित त्या ठिकाणाहून दूर जाणे "GO" आणि विश्वासातील मोठ्या व्यक्तीला सांगणे "TELL" या तीन महत्त्वपूर्ण कृतींबाबत माहिती देण्यात आली. तसेच “सुरक्षित वर्तुळ” या संकल्पनेद्वारे मुलांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तींची ओळख करून देत मदत कशी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मायभूमी ग्राम विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये बाललैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटनांविषयी आवश्यक जागरूकता निर्माण होत असून, सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श ओळखण्याची क्षमता वाढत आहे. या सत्रानंतर मुले घरी पालकांशी संवाद साधतील, ज्यामुळे पालकांनाही या विषयाचे गांभीर्य समजून कुटुंब पातळीवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास चालना मिळेल. मुलं आणि पालक दोघांमध्येही विश्वास, संवाद आणि सजगता वाढवणे हे मायभूमी ग्राम विकास संस्थेचे मुख्य ध्येय आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष अस्मिता रेपे,  उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव संतोष रेपे, सदस्य अंकुश रेपे व काजल पाटील काम करत आहेत.

या सत्राला शाळेचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. मुख्याध्यापिका राजश्री व्यंकटेश, मुख्य प्रशासक श्वेता मोहोळ, उपमुख्याध्यापिका अमृता दशपूत्रे व शिक्षकवर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृती कार्यक्रमांसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सत्र अधिक प्रभावी बनवले.

मायभूमी ग्राम विकास संस्था भविष्यातही बालसुरक्षा, बालहक्क आणि कुटुंब सक्षमीकरण या विषयांवर सातत्याने कार्य करत राहणार असून समाजात सुरक्षित आणि सशक्त बालपण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू; अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २० फेब्रुवारी – दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय: ३७ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपअभियंता दीपक पांडे (३०) आणि ठेकेदार राहुल पांचाळ (३३) या दोघांविरोधात मृताचे बंधू भंवरलाल रावल याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकाच्या होम फलाट वरील तिकीट काऊंटर बाहेरील भागात २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.१० च्या सुमारास अर्थिंगसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना खंगाराम रावल यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे राहणारे खंगाराम हे खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.

खंगाराम यांच्या मृत्यूप्रकरणी दीपक पांडे आणि राहुल पांचाळ या दोघांनी खंगाराम यांना कोणतेही सेफ्टी उपकरण न पुरविल्यामुळे हयगय व निष्काळजीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.

मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रयत्नांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदार संघाला मुंबई आणि नवी मुंबई या शहरांशी जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेे यांच्या प्रयत्नांना आता आणखी एक यश आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ऐतिहासीक प्रकल्पाची घोषणा केली आहे.

 कल्याण-डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. कल्याण फाटावरून ही मेट्रो दहीसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६- २७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घेतला.

यावेळी त्यांनी पलावा . उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गा पर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, काटई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका

ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण – मानपाडा – काटई नाका – कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन-१२-9शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे.

निळजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे– बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे. 

मेट्रो १२ अ ची स्थानके

या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे. प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव.

संरचनात्मक संकल्पना

या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे. मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण– राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (इंटिग्रेटड सिंगल पायर) संकल्पना वापरली जाणार आहे.(फ्लायओव्हरचा सुपर- स्ट्रक्चर वगळून).

कल्याणफाटा ते राजनोली दरम्यान डबल डेकर उड्डाणपूल

कल्याण शीळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा (शिळफाटा) ते भिवंडीजवळी आग्रा महामार्गावरील राजनोली पर्यंतचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ठिकाणी डबर डेकर उन्नत मार्ग उभारणीसाठी एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. या चार पदरी डबल डेकर उन्नत मार्गावरून एकाच वेळी मेट्रो आणि रस्ते वाहतूक होणार आहे. कोणत्याही कोंडीशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागातले वर्दळीचे चौक टाळून या मार्गाने शिळफाटा ते थेट भिवंडी असा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ५ हजार ९०९.२१ कोटी इतका असून त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या उन्नत मार्गाची एकूण लांबी १९.४० किलोमीटर इतकी आहे. याची सुरूवात कल्याणफाटा (शिळफाटा जंक्शन) पासून होऊन कटई नाका, पत्री पूल, गोविंदवाडी बायपास मार्गे भिवंडीतील राजनोली जंक्शन येथे समाप्ती होईल. 

मेट्रो इंटीग्रेशन

या मार्गाचा समावेश ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५, कल्याण - तळोजा मेट्रो मार्ग १२ या दोघांशी होईल. तसेच कल्याण - तळोजा मेट्रो १२ अ या विस्तारीत मार्ग आणि कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ या प्रस्तावीत मेट्रो मार्गांशीही याचे समन्वय केले जाणार आहे. 

कसा असेल उन्नत मार्ग

या उन्नत मार्गामध्ये पहिल्या स्तरावर वाहनांसाठी रस्ता असणार आहे. तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गावर ८ ठिकाणी प्रवेश (इंट्री) आणि निर्गमन (एक्झिट) रस्ते (रॅम्प) प्रस्तावित आहेत. या मार्गात २ रेल्वे उड्डाणपूल (पलावा - दिवा पनवेल आणि पत्री पूल क्रॉसिंग) तसेच २ प्रमुख पूल, देसाई खाडी आणि उल्हास नदी (दुर्गाडी परिसर) प्रस्तावित आहेत.

शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार होणार बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण मोफत उपचारांची योजना अवघ्या अडीच वर्षांत मागे घेण्यात आली असून आरोग्य विभागाने उपचारांसाठी नवीन शुल्कदर लागू केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ओपीडी तपासणीपासून विविध तपासण्या, शस्त्रक्रिया, आयसीयू, डायलिसिस, रुग्णवाहिका आदी सेवांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. मात्र ही शुल्कवाढ फार नसून अगदी नाममात्र आणि सर्वांना परवडणारीच असल्याचे नवीन शुल्कांवरून दिसून येत आहे.

* नवीन निर्णयानुसार ओपीडी केसपेपर नोंदणीसाठी ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
* रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी दररोज १० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
* शहरी भागात ओपीडीसाठी १० रुपये शुल्क पूर्वीपासून असले तरी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी सेवा मोफत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

तपासण्यांच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. एमआरआय स्कॅनसाठी १६०० रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे दर १२०० रुपये होते. डोक्याच्या सीटी स्कॅनसाठी ३०० रुपये, तर मणका, मान आणि छातीच्या सीटी स्कॅनसाठी ४०० रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे. या तपासण्यांचे दर पूर्वी तुलनेने कमी होते. हिमोग्लोबिन, टीएलसी, डीएलसी, रक्तगट, लघवी तपासणीसह प्रत्येक रक्ततपासणीसाठी १५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
भूल देऊन करण्यात येणाऱ्या लहान व मोठ्या शस्त्रक्रियांसाठी ६० ते १६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी हे सर्व उपचार पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी पूर्णतः मोफत होते.

मात्र आता या सवलती कायम राहणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
* गंभीर रुग्णांसाठी आयसीयू सेवेसाठी दररोज १०० रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे शुल्क ५० रुपये होते.
प्रत्येक डायलिसिससाठी १५० रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे.
* रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर ५ रुपये आकारले जाणार असून याआधी सरकारी रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध होती.
* प्रसूती सेवांबाबत पहिली प्रसूती मोफत राहणार आहे. मात्र दुसऱ्या प्रसूतीसाठी ५० रुपये आणि तिसऱ्या व पुढील प्रत्येक प्रसूतीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
* वातानुकूलित खोलीसाठी दररोज १५० रुपये, तर साधारण खोलीसाठी ७५ रुपये शुल्क असेल. मृतदेह एम्बाल्मिंगसाठी १५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ओपीडी व शस्त्रक्रिया मोफत असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिकारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कल्याण-डोंबिवलीत शिवजयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नवचर्चित महापालिका महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अति.आयुक्त हर्षल गायकवाड, अति.शहर अभियंता (विद्युत/यांत्रिकी) प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  महापौर हर्षाली विजय चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवलीतही राज्यगीताचे गायन करुन महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमहापौर राहुल दामले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या समयी उपस्थित उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर, भरत पवार, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या समयी महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्र.६८, धाकटे शहाड येथील शाळा क्र.३३ व उंबर्डे येथील शाळा क्र.१२ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या कडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने वागळे गुन्हे युनिट क्र.५ कडून जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे -  गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र. ५ कडून वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या इसमाकडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली आहेत.

वागळे इस्टेट पोलीस ठाणे, येथे गु.र.नं ४०/२०२६ भा. न्या. सं कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये दि. ०५/०२/२०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची ५ चारचाकी वाहने आरोपी नामे संदिप रघु शेट्टी, राहणार: उलवे, नवी मुंबई याने मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून कोणतेही भाडे न देता, तसेच त्यांची वाहने परत न देता त्या इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून, फिर्यादी यांच्या वाहनांचा अपहार करून त्यांची फसवणुक केली होती. तसेच आरोपी संदिप शे‌ट्टी हा स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता.

सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व तसेच गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून आरोपी संदिप रघु शेट्टी (वय: ३८ वर्ष) यास दि. ०६/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी शे‌ट्टीकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्याने अशाप्रकारे अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांची चारचाकी वाहने ताब्यात घेवून त्या परस्पर इतरांकडे गहाण ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सदरबाबत अधिक सखोल तपास केल्यानंतर आरोपीकडून सुमारे रु. २,४४,१५,०००/- रू. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली असून सदर वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त (शोध-१ गुन्हे) शेखर बागडे साो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सपोनिशरद पाटील, पोहवा. विजय काटकर, रोहिदास रावते, हर्षद तारी, संदिप शिंदे, पोना. तेजस ठाणेकर, सचिन बंडगर, पोकाँ. मिनीनाथ शिकारे, यश यादव या पथकाने केली आहे.