संदीप भैया पाटोळे यांनी जिल्ह्याच्या शिशुगृहाचे अध्यक्ष म्हणून झिरो ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पालकत्व स्वीकारत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच, किल्ले लळींग संवर्धन समितीच्या माध्यमातून लळींग किल्ल्याचे प्रवेशद्वार तयार केले आणि किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
संस्थेच्या कामाची पाहणी करताना त्यांनी पर्यावरणासाठी राबवण्यात येत असलेल्या वनराई प्रकल्पाचे कौतुक केले आणि त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, 19 फेब्रुवारी रोजी वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रम सप्तशृंगी महिला संस्था व किल्ले लळींग समिती एकत्रित राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
महिला सशक्तीकरणासाठी योगदान देणाऱ्या महिलांना "राजमाता जिजाऊ पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव करणाऱ्या पाटोळे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांसाठी प्रोत्साहन देण्याचे वचन दिले.
सप्तशृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी संदीप भैया पाटोळे यांना दिलेल्या पाठबळाबद्दल आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा