डोंबिवली : निसर्गाच्या सान्निध्यात राहणे सर्वानाच आवडते. त्यातून फेब्रुवारी महिना म्हणजे द्राक्षांचा महिना, सर्व मुलांना आवडणारे फळ म्हणजे द्राक्ष. असाच आनंद लुटण्यासाठी 'जे एम एफ' मंडपात द्राक्षांचा मळा फुलवण्यात आला आणि द्राक्षांबरोबरच कलिंगड, केळी , अननस, आणि अनेक फळं ठेवण्यात आली. मोठा मळा बनवून द्राक्षांचे घोस दोरीला लटकवून ठेवले गेले ही कल्पना अस्तित्वात आणली ते म्हणजे 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी. मुलांच्या आनंदामधे आनंद मानणारे कोल्हे दाम्पत्य नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी सज्ज असतात.
१७ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या खजिनदार व चित्रपट दिग्दर्शिका जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस. दरवर्षी जान्हवी मॅडम चा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांचे आजी आजोबा सोबत साजरा केला जातो व निसर्गाच्या सानिध्यात छोट्याशा सहलीचे आयोजन केले जाते, पर्यंतु ह्या वर्षी मुलांसहित सर्व पालकांना, आजी आजोबांना 'जे एम एफ' मंडपम मध्ये साकारलेल्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. पालकांनीही मुलांबरोबर येथेच्छपणाने द्राक्षाचा आनंद लुटला. संस्थेच्या सचिव व जान्हवी कोल्हे यांच्या मातोश्री डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या लेकीला औक्षण करून भरभरून आशीर्वाद दिला तर संस्थापक व पिताश्री डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील लाडक्या लेकीला 'यशस्वी भव' असा शुभाशीर्वाद दिला. त्यासोबत सर्व आजी आजोबांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. एकाच वेळी एवढे मोठे मनापासून दिलेले आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव बघून मी कृतकृत्य आणि धन्य झाले असे उद्गार जान्हवी कोल्हे यांनी काढले. प्रत्येक वाढदिवस हा मला नेहमीच नवीन अनुभव आणि आनंद देऊन जातो आणि दरवर्षीच 'जे एम एफ' कुटुंबाबरोबर मला माझा वाढदिवस साजरा करण्यात आनंद मिळतो असेही त्या म्हणाल्या.
सर्व कलात्मक शिक्षकांनी ही द्राक्षांची बाग बनवली. शिशुविहार ते इयत्ता आठवी पर्यंत सर्वच मुलांनी लटकवलेली द्राक्ष हात न लावता, उडी मारून खाण्याचा आनंद घेतला. अनेक फळांनी सजवलेली ही बाग म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच होती. शिशु विहार च्या शिक्षकांनी सुंदर रित्या फळे कापून फळांचा केक, फळाचे प्राणी आणि सुबकरीत्या फळांचे तबक सजवून ठेवले होते. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते बागेचे उद्घाटन करून सर्व मुलांनी एकच जल्लोष केला व स्वतः डॉ. श्री व सौ कोल्हे यांनी मुलांना त्यांच्या हाताने खाऊ घातले. द्राक्षाच्या बागेत तर-तऱ्हेची खेळणी ठेवण्यात आली होती. सर्व मुलांनी त्या सर्व खेळण्याचा आनंद लुटला.
फलाहार हा आरोग्यासाठी नेहमीच चांगला असतो, रोज पिझ्झा, बर्गर, मॅगी सारखे फास्ट फूड न खाता ऋतुनुसार फळं खावी, असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना मनसोक्तपणे फळे खाऊ घातली. रोजच्या शालेय डब्यात देखील रोज एक फळ आणा आणि प्रतिकार शक्ती वाढवा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगितले. 'जन गण मन' सीबीएसई , विद्यामंदिर तसेच पदवी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व मुलांनी द्राक्ष महोत्सवाचा आनंद लुटला. शिशु विहार मधील अनेक छोट्या मुली मुले शेतकरी वेशभुषेमधे आली होती, व स्वतःच्या हाताने फळांचे तबक घेऊन आनंदाने वावरत होते. सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील 'जे एम एफ' द्राक्ष बागेत बागडण्याचा आनंद घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा