मुंबई : राज्यात कायदा-सुव्यवस्थेची वाताहत झाली असून सरकार अपयशी ठरले आहे, असा घणाघात जोगेश्वरी पूर्वचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात केला.
महत्वाचे मुद्दे:
🔹 संघटित गुन्हेगारी, खंडणी, बलात्कार, हत्या, भ्रष्टाचार वाढतोय, पण सरकार शांत!
🔹 जोगेश्वरीत १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी अजूनही फरार.
🔹 सत्यम इंडस्ट्रीजचे मालकांचा दिवसाढवळ्या निर्घृण खून, पण अद्याप ठोस कारवाई नाही.
🔹 शासकीय विभागांत भ्रष्टाचाराचा उच्चांक, जबाबदार अधिकारी कुठे आहेत?
🔹 बांद्रेकरवाडी आणि गरीब नवाज सोसायटी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवासी अडचणीत.
🔹 मुंबईतील सरकारी जमिनी असुरक्षित, बिल्डर लॉबीला मोकळे रान का?
🔹 म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेबाबत सरकार गंभीर आहे का?
https://youtu.be/CPtyvEjFOH0?si=PBlnnUwsQBmLmWJ5
आमदार अनंत (बाळा) नर यांनी सरकारला थेट सवाल केला – "खून, बलात्कार, चोरी यांसारखे गुन्हे होईपर्यंत पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेणार का?"
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा