संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
अग्नी सुरक्षा सप्ताह २०२५ निमित्ताने मुंबई अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध ठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत. "सावध रहा, सुरक्षित रहा!" या संदेशासोबत नागरिकांना आगीच्या धोक्यांपासून बचावाचे धडे दिले जात आहेत.
१३ एप्रिल – रणभेरी वाजली रस्त्यावर!
परिमंडळ ३ तर्फे वांद्रे अग्निशमन केंद्र ते अंधेरी अग्निशमन केंद्र दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायरन, बॅनर्स आणि अग्निशमन दलाच्या शिस्तबद्ध पावलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
१५ एप्रिल – समाजाच्या हृदयाशी भिडले ‘फायर सेफ्टी’चे धडे!
शिव साफल्य गृहनिर्माण संस्था, शिवाजी नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
"आग लागल्यावर घाबरायचं नाही, सज्ज व्हायचं!" या मंत्रासोबत नागरिकांना फायर इक्स्टिंग्विशर वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
अग्निशमन दलाचे अधिकारी, स्वयंसेवक यांची प्रेरणादायी उपस्थिती
या कार्यक्रमात मरोळ अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ केंद्र अधिकारी अजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कायम सज्जतेचा संदेश दिला.
समाजसेविका आणि अग्निशमन स्वयंसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी महिलांना आग लागल्यास काय काळजी घ्यावी यावर विशेष मार्गदर्शन केले.
स्थानिक सहभाग हीच खरी ताकद!
कार्यक्रमाचे आयोजन शिव साफल्य संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. डॉमिनिक फर्नांडिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने केले.
"जनजागृती हीच खरी आग विझवण्याची पहिली पायरी आहे!" हे त्यांचे विचार उपस्थित नागरिकांना प्रेरणा देऊन गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा