BREAKING NEWS
latest
ताज्या बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ताज्या बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विद्यार्थ्यांच्या मनात थरांच्या उंचीइतकी प्रेरणा...! जय जवान गोविंदा पथकाचं भांडुपमधील थरारक सादरीकरण


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)

नुकतेच भांडुप (प.) येथील यशवंत चांदजी सावंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष नगर येथे एक आगळं-वेगळं दृश्य पाहायला मिळालं. परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीला दिली जाणारी ऊर्जा यांचा अनोखा संगम विद्यार्थ्यांनी अनुभवला – कारण जय जवान गोविंदा पथकाला शाळेकडून थरांचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.

या वेळी विद्यार्थ्यांनी गोविंदांच्या सादरीकरणाकडे केवळ पाहिलं नाही, तर त्या प्रत्येक थरात त्यांनी प्रेरणाही शोधली. प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिस्तबद्ध आणि जीव ओतून सादर केलेलं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर ठसलं. त्यांच्या डोळ्यांतील चमक, विचारलेले प्रश्न, आणि प्रत्येक क्षणाचं कौतुक – हे दृश्य वर्णन करण्याइतपत शब्द अपुरे पडतात.

दहीहंडी केवळ सण नाही तर तो आता संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास शिकवणारा एक प्रकारचा साहसी खेळ बनला आहे, हे या उपक्रमाने अधोरेखित केलं. या विशेष कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक राजू तु. गडहिरे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले गेले.


जोगेश्वरीत मनपा शाळेसमोरचा ‘मौत का चेंबर’ – पाय अडकून नागरिक जखमी, स्थानिकांनी जीव वाचवला!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)

जोगेश्वरी (पूर्व) प्रभाग क्र. ७३ मधील गांधीनगर येथील मनपा शाळेसमोरील रस्त्यावरील तुटलेला चेंबर सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. आज (18 एप्रिल) सकाळी 11 वाजता या धोकादायक चेंबरमध्ये एका नागरिकाचा पाय अडकला.


हा चेंबर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच असून, दररोज शेकडो मुले-पालक या मार्गाने जातात. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूचे स्थानिक नागरिक मदतीला धावले. तात्काळ परिस्थिती पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेनेचे उपसचिव अमित पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत त्वरीत मदतीसाठी मार्गदर्शन केले.

स्थानिक रहिवाशांनी एका वेल्डिंग करणाऱ्याच्या मदतीने चेंबरवरची धातूची जाळी कापून त्या नागरिकाचा पाय बाहेर काढला. हे दृश्य इतके भयावह होते की आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटनेनंतर रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. मात्र, प्रशासनाने यापूर्वी वारंवार तक्रारी असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांचं म्हणणं आहे की, “हा चेंबर जर लवकरात लवकर दुरुस्त झाला नाही, तर पुढे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते. यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावी.”


राष्ट्रवादीचा डिजिटल घोषणापत्र: फक्त एक संदेश आणि तपशील मिळवा!

सर्वसामान्यांना आता घोषणापत्राचे तपशील थेट मोबाइलवर

बारामतीत आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 'महा राष्ट्रवादी घोषणापत्र' लाँच केले. या अभिनव उपक्रमात नागरिकांना 9861717171 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर फक्त एक संदेश पाठवून राष्ट्रवादीचे घोषणापत्र वाचनाची संधी मिळणार आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून नागरिकांना कॉल करण्याची गरज नाही. फक्त संदेश पाठविला तरी आपोआप दोन भाषांमध्ये – हिंदी व मराठी – घोषणापत्राची सर्व माहिती मिळेल.

या वेळी पक्षाने विधानसभा मतदारसंघांनुसार स्वतंत्र घोषणापत्रदेखील सादर केले. मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि गोंदियामध्ये कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते घोषणापत्र अनावरण झाले.

"निर्धार-एक हात आपुलकीचा" संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगलाच प्रतिसाद!


विशेष प्रतिनिधी
रविवार दि.२६ मे २०२३: जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने अरविंद गंडभीर हायस्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

दर सहा महिन्यांनी निर्धारतर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. निर्धारच्या आठव्या रक्तदान शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. तनुजा कुमार, भारतीय आयुर्विमा महामंडळ मधून वरिष्ठ मंडल प्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झालेले व्यक्ती लाभली होती. 

सकाळी ९ वाजता पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शाल, व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रक्तदात्यांचा ओघ शिबिराकडे वाढू लागला. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळात एकूण ५९ इच्छुकांनी आपली नावे नोंदवली. त्यापैकी काहींना आरोग्याच्या कारणामुळे रक्तदान करता आले नाही.

एकूण ५२ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.मे महिन्याचे सुट्टीचे दिवस, त्यामुळे बहुसंख्य लोक बाहेरगावी गेलेले असतानाही रक्तदात्यांची ही उपस्थिती कौतुकास्पद होती. रक्तपेढी आणि हॉस्पिटल्समध्ये सध्या जाणवणारा रक्ताचा तुटवडा काही अंशी भरून काढण्यात आजचे रक्तदान शिबिर नक्कीच उपयुक्त ठरेल असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच, शिबिराला नवोदित रक्तदात्यांनी आवर्जून रक्तदान केले, हे पाहता निर्धारतर्फे रक्तदानासाठी समाजात करण्यात येणारी जागृती नक्कीच लोकांपर्यंत पोहोचत आहे असे दिसून येते आणि निर्धार आयोजित यापुढील रक्तदान शिबिरेही अशीच उत्तरोत्तर यशस्वी ठरले असेही काही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात "निर्धार-एक हात आपुलकीचा" या समाजसेवी संस्थेचे सर्व कार्यकर्ते, व मातोश्री मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे सर्व प्रतिनिधी यांनी मोलाचा हातभार लावला. शिबिराच्या समारोपाला प्रायोजक, निर्धार चे हितचिंतक, आणि जे.इ.एस चे विश्वस्त आणि रक्तदाते  यांचे निर्धारतर्फे आभार मानण्यात आले.

लोकसभा चुनाव 2024 के उम्मीदवार रवींद्र वायकर का रिकॉर्ड तोड़ प्रचार अभियान!


संवाददाता: संदिप कसालकर

लोकसभा चुनाव 2024 के लिए मुंबई उत्तर पश्चिम जिले के उम्मीदवार रवींद्र वायकर के प्रचार में शामिल कार्यकर्ताओं की संख्या हजारों के पार पहुंच गई। 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मुंबई यात्रा के बाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रवींद्र वायकर के प्रचार रैली में अनिवार्य रूप से उपस्थिति दर्ज कराई।


इस मौके पर शिवसेना शिंदे गुट ने शक्ति प्रदर्शन किया। इस रोड शो में करीब 800 बाइकर्स, 400 से ज्यादा रिक्शा और हजारों कार्यकर्ता नजर आए।

वायकर के प्रचार अभियान में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ उद्योग मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यक मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेता अर्जुन खोतकर समेत कई बड़े नेता मौजूद रहे। इस बीच कानून व्यवस्था बनाए रखने के लिए भारी मात्रा में पुलिस बल भी वहां मौजूद रहा। प्रचार यात्रा इच्छापूर्ति गणेश मंदिर से शुरू होकर मेघवाड़ी, पंपहाउस, शेरे पंजाब, बिंद्रा कॉम्प्लेक्स, एमआईडीसी, सुभाष नगर बिट चौकी पर रुकी।

Youtube Link:

उमेदवार रवींद्र वायकर यांची रेकॉर्ड ब्रेक प्रचार फेरी! मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे नेते सामील...

पालिकेच्या पी-दक्षिण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे लहान मुलगी गंभीर जखमी!

संदिप कसालकर

एक लहान मुलगी तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या गटारात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेत नुकतीच घडली आहे.

गोरेगाव पूर्व येथील संकप्ल सिद्धी सोसायटी कुटीनो कॉलनी या सोसायटी शेजारीच वाहणाऱ्या मुख्य नाल्याशेजारीच असणाऱ्या परिसरात पालिकेच्या पी-दक्षिण विभागातर्फे बसविण्यात आलेल्या लाद्या तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. दरम्यान एक लहान मुली येथून जात असताना तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या लाद्यांच्या फटींमध्ये तिचा पाय कडून तिला गंभीर दुखापत झाली आहे.

सदर घटना कळताच या परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख अजित भोगले यांनी धोकादायक परिस्थितीत असणाऱ्या लाद्या तात्काळ बदलून घेतले आहेत. सदर घटना पाहता पालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभे राहिल्याचे दिसून येत आहे. 



"महानगर पालिकेला विनंती आहे की, लोकांनी मागणी केली नसताना व नको तिकडे किंवा गरज नसलेल्या ठिकाणी कामे करण्या पेक्षा अशा ठिकाणी काम करावे जेणे करून असे प्रकार होणार नाहीत." - अजित भोगले (शाखा प्रमुख, शिवसेना शाखा ५४, शिवसेना ठाकरे गट)

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात २५००० महिलांसाठी भव्य-दिव्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन!

 

संदिप कसालकर

२५००० महिलांसाठी भव्य दिव्य अश्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र नाथ ठाकूर तसेच समाजसेविका ममता ठाकुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी परिसरात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


दरम्यान या प्रसंगी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली. सलग १२ वर्षांपासून आपण अश्या प्रकारचे उपक्रम जोगेश्वरी पूर्वेतील वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अश्या उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यास मदत होत असून घराघरात हि पोहोचता येते. आशीर्वादही मिळत असतो असे धर्मेंद्र नाथ ठाकूर यांचे मत आहे.


दरम्यान सदर उपक्रम न फक्त वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबविण्यात येणार असून संपूर्ण जोगेश्वरी विधानसभेतील ३० वेगवेगळ्या ठिकाणी २५,००० महिलांसाठी सलग १७ दिवस हळदीकुंकू कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे ठाकूर आणि सांगितले आहे.







चित्रपटसृष्टीचे धगधगते पर्व - व्ही शांताराम

चित्रपटसृष्टीचे धगधगते पर्व - व्ही शांताराम
रोहन दसवडकर

शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. व्ही शांताराम यांना शांताराम बापू या नावाने देखील ओळखले जायचे. ते डॉ. कोटणीस की अमर कहानी (1946), अमर भूपाली (1951), झनक झनक पायल बाजे (1955), दो आँखे बारह हाथ (1957), नवरंग (1959), दुनिया न माने (1937) पिंजरा (1972) अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी ओळखले जायचे. 
१९२० साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते सामील झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कलेची मूळाक्षरे तेथे त्यांनी गिरविली. नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये (स्पेशल इफेक्ट्‌स) अशा प्रत्येक शाखेतील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे ‘व्ही. शांताराम’ असे चित्रपटीय नामकरण केले.
    1927 मध्ये त्यांनी 'नेताजी पालकर' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. १९२९ मध्ये त्यांनी विष्णुअंत दामले, के.आर.सोबत 'प्रभात फिल्म कंपनी' स्थापन केली. डायबर, एस. फतलाल आणि एस.बी. कुलकर्णी यांनी 1932 मध्ये 'अयोध्येचा राजा' हा पहिला मराठी भाषेतील चित्रपट बनवला. त्यांनी मुंबईत "राजकमल कलामंदिर" बनवण्यासाठी 1942 मध्ये प्रभात कंपनी सोडली. कालांतराने, "राजकमल" हा देशातील सर्वात अत्याधुनिक स्टुडिओ बनला.
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिनने व्ही शांताराम यांच्या '' या मराठी चित्रपटासाठी विशेष कौतुक केले त्यांना त्यांचा माणूस हा चित्रपट फार आवडला होता. 
व्ही. शांताराम यांचे तीन विवाह झाले. त्यांची पहिली पत्नी विमल (अंबू मुगलखोड– १९२२), दुसरी जयश्री (जयश्री कामुलकर - १९४१) आणि तिसरी संध्या (विजया देशमुख–१९५६) होय. यांपैकी जयश्री व संध्या या ख्यातकीर्त अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. पुढे जयश्रीशी त्यांनी घटस्फोट घेतला (१९५६). त्यांना दोन मुलगे (प्रभातकुमार व किरणचंद्र) आणि पाच मुली (सरोज, मधुरा, चारुशीला, राजश्री व तेजश्री) आहेत. प्रभातकुमार आणि किरणचंद्र यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, तर मुलींपैकी राजश्रीने अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
    सुश्राव्य संगीत हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटनिर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर इ. नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले.
व्ही. शांताराम यांच्या ठायी असलेल्या औदार्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनही काही प्रसंगांतून घडते. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्नावस्थेत गेले.
त्या काळात व्ही. शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचा उदरनिर्वाह काही काळ चालविला. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हृदयद्रावक तर आहेत, परंतु समस्त कला क्षेत्रातील मान्यवरांना अंतर्मुखही करणारा आहे. या श्रेष्ठ चित्रपतीचे मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९९० मध्ये निधन झाले.