जोगेश्वरी (पूर्व), प्रभाग क्र. ७३ मधील गांधीनगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील शौचालयाच्या टाकीमधून घाणीचे पाणी वारंवार बाहेर येत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक रहिवाशांना होत होता.
या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत अमित दशरथ पेडणेकर (युवासेना उपसचिव) यांनी तातडीने पालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाने दखल घेतली आणि संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. नागरिकांनी या सकारात्मक बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.
या तक्रारीमुळे स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रभावी नेतृत्व किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट झाले आहे. भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहू, असे अमित पेडणेकर यांनी सांगितले.