BREAKING NEWS
latest
latest updates. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest updates. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंत्रालयात जायचंय? आधी ‘डिजीप्रवेश’ ॲपवर नोंदणी करा, नाहीतर प्रवेश बंद!


मुंबई, दि. २७ : मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून, आता प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे अभ्यागतांना आता पूर्वनियोजित वेळेनुसार आणि ठराविक विभागातच प्रवेश मिळणार आहे.

काय आहेत नवीन नियम?

  • अभ्यागतांना केवळ संबंधित विभागात आणि ठरलेल्या वेळेतच प्रवेश करता येणार.

  • अनधिकृत ठिकाणी फिरताना आढळल्यास कारवाई होणार.

  • मंत्रालयातील काम संपल्यावर निर्धारित वेळेत बाहेर पडणे बंधनकारक.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

  • दुपारी १२ वाजता प्रवेश दिला जाणार.

  • स्वतंत्र रांगेची सुविधा उपलब्ध.

  • वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

सर्वसामान्य अभ्यागतांसाठी प्रवेश नियम

  • दुपारी २ नंतरच प्रवेश मिळेल.

  • ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे ऑनलाइन प्रवेश पास घ्यावा लागेल.

  • आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे ओळखपत्र आवश्यक.

स्मार्टफोन नसलेल्या किंवा अशिक्षित व्यक्तींसाठी मदत केंद्र

  • गार्डन गेट येथे विशेष मदत केंद्र सुरू.

  • ऑनलाईन नोंदणी व मदतीसाठी एक खिडकी उपलब्ध.

‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे नोंदणी कशी करावी?

  1. Play Store किंवा Apple Store वरून ॲप डाऊनलोड करा.

  2. आधार क्रमांकाच्या आधारे छायाचित्र ओळख पटवून नोंदणी करा.

  3. संबंधित विभागासाठी स्लॉट बुक करून QR कोड प्राप्त करा.

  4. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर QR कोड दाखवून RFID कार्ड मिळवा.

  5. सुरक्षा तपासणी झाल्यावर प्रवेश मिळेल.

  6. बाहेर जाताना RFID कार्ड परत करणे बंधनकारक.

नवीन प्रणालीचे फायदे

  • प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व वेग.

  • सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम.

  • रांगेशिवाय जलद प्रवेश.

‘डिजीप्रवेश’ ॲपमुळे मंत्रालयात प्रवेश अधिक सोपा आणि सुरक्षित होणार असून, नवीन प्रणालीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

साठ्ये महाविद्यालयात जनसंवाद विभागाच्या माध्यम महोत्सवचा बोलबाला....

साठ्ये महाविद्यालयात जनसंवाद विभागाच्या माध्यम महोत्सवचा बोलबाला....

रोहन दसवडकर

विलेपार्ले पूर्व येथील साठये महाविद्यालयातील जनसंवाद विभागाचा येत्या 15, 16, 17 डिसेंबर रोजी माध्यम महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी काल दिनांक ५ डिसेंबर 2023 रोजी या माध्यम महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
उद्घाटन समारंभाला साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे सर त्याचबरोबर उपप्राचार्य डॉ . दत्तात्रय नेरकर , उपप्राचार्या श्रीमती प्रमोदिनी सावंत , माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. केतन भोसले , डॉ . सूरज पंडित , प्रा . रसिका सावंत , प्रा . नारायण परब आदी प्राध्यापक उपस्थित होते . 

या उद्घाटनाची सुरुवात फ्लॅश मॉबने झाली. भारतीय संस्कृती - जतन समृध्दीचे , वारसा परंपरेचा ही या वर्षीची माध्यम महोत्सवाची संकल्पना असल्यामुळे फ्लॅश मॉब देखील तसाच पाहायला मिळाला.  
विविध राज्यांची लोकनृत्ये मुलांनी एका वेगळ्याच जल्लोषात सादर केली. याचे दिग्दर्शन परफॉर्मन्स टीम हेड रोहन दसवडकर व सायली आंगवलकर यांनी केले. 


त्यानंतर प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात माध्यम महोत्सवच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला साठ्ये महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीने आणि उत्साहाने हा उद्घाटन समारंभ धुमधडाक्यात पार पडला.